भाग – १५
लाल महालावरील कब्जा शनिवार वाडा....!
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हिंदू धर्माचे नसून....शाक्त व बौध्द धर्मीय आहेत.
जिजाऊ प्रकाशन
माता जिजाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली संभाजी तयार होऊ लागले.
छत्रपती शिवराय स्वराज्य वाढविण्यासाठी व्यस्त होते.अशा मध्ये बाळ
संभाजीची पालन पोषणाची जबाबदारी माता जिजाऊ यांचेवर येऊन पडली होती.त्यांना
त्यांच्या वडिलाकडून म्हणजे लखुजी जाधव यांचेकडून जे संस्कार मिळाले
होते...ते संस्कार नुसार त्यांनी शिवरायांना घडविले होते.त्याच संस्कारा
नुसार त्यांनी संभाजीना वाढविले होते.म्हणजे त्यांना महावीर – बौध्द -संत
नामदेव महाराज – गुरुनानक – चक्रधर -बसवेश्वर – बळीराजा – सम्राट अशोक –
महाराणा प्रताप यांनी जे लोक कल्याणकारी कार्य केले ते कार्य त्यांनी
संभाजीच्या मनावर बिंबविले होते.त्यांनी कधीही ब्रह्मा विष्णू महेश राम
कृष्ण गौरी गणपती यांच्या मनघडत कथा पुराण कधी सांगितले नाही.वैदिक धर्म
पंडित यांनी दिलेला व्यभिचारी महाभारत कथा आणि स्त्री विटंबना रामायण कथा
कधी सांगितल्या नाही.त्यामुळे वैदिक धर्म पंडितांनी दिलेला सनातनी हिंदू
धर्माचा आणि संभाजीराजे यांचा काडीमात्र संबध येत नाही.त्यामुळे त्यांना
वैदिक धर्म पंडितांनी जी धर्मवीर पदवी दिलेले आहे...तो त्यांचा घोर आपमान
आहे...आणि तो अपमान करण्याचा आपल्याला कोणताही अधिकार नाही. असे लेखक
चंद्रशेखर शिखरे लिखित “छत्रपती संभाजीराजांची संघर्षगाथा” या पुस्तका
मध्ये पान क्रमांक २८ वर “संस्कार” या मथळ्याखाली लिहिले आहे. त्यामुळे
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हिंदू धर्माचे नसून शाक्त
व बौध्द धर्मीय आहेत.
No comments:
Post a Comment