भाग – १२
लाल महालावरील कब्जा शनिवार वाडा....!
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हिंदू धर्माचे नसून....शाक्त व बौध्द धर्मीय आहेत.
जिजाऊ प्रकाशन
वैदीक धर्म पंडितांनी मनुस्मृतीच्या माध्यमातून मानवाचा विकास रोखण्यासाठी
तसेच त्याच्या ज्ञानात वाढ होऊन त्यांना प्रश्न विचारू नये यासाठी त्यांनी
अठरा पगड जातींवर आणि बारा बलुतेदारावर सहा प्रकारच्या बंद्या घातल्या
होत्या.त्यातील बंदी क्रमांक १) धर्म बंदी २) शास्त्र बंदी ३) शस्त्र बंदी
४) व्यापार बंदी ५) धनसंचय बंदी ६) समुद्र
प्रवास बंदी अशा प्रकारच्या त्या बंद्या होत्या.या सर्वांना भेद
देण्यासाठी शिवरायांनी अठरा पगड जातींच्या म्हणजे अस्पृश्य व आदिवासी यांना
गडकरी – किल्लेदार – पाटील म्हणून नेमणुका दिल्या. वैदीक धर्म पंडितांनी
घातलेली शस्त्र बंदी मोडून त्यांच्या हाती शस्त्र देऊन सनातनी जातीय
चातुवर्ण व्यावस्थेला जबरदस्त हादरा दिला.यावरून छत्रपती शिवराय सनातनी
धर्म मानीत नव्हते.त्यामुळे ते हिंदू धर्मीय नव्हते असे स्पष्टपणे दिसून
येते.असे लेखक चंद्रशेखर शिखरे लिखित “छत्रपती संभाजीराजांची संघर्षगाथा”
या पुस्तका मध्ये पान क्रमांक २४ वर “बारसे” या मथळ्याखाली लिहिले आहे.
त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हिंदू धर्माचे
नसून शाक्त व बौध्द धर्मीय आहेत.
No comments:
Post a Comment