Friday, 3 November 2017

भाग क्र.९ स्वराज्याचा खरा इतिहास....लाल महालावर शनिवार वाड्याचा कब्जा.....!

भाग क्र.९
स्वराज्याचा खरा इतिहास....लाल महालावर शनिवार वाड्याचा कब्जा.....!
स्वराज्यातील पहिले शिक्षेचे फर्मान...पासलकर वाड्याला अगण्य महत्व........!
रांझाच्या गुजर पाटलाचे हातपाय कलम करून त्याचा केला चौरंगा....!
आता शिवरायांनी स्वराज्याचा पहिला कारभार माता जिजाऊच्या मार्गदर्शनाखाली पासलकर वाड्यातून सुरु केला.तेव्हा राझांच्या गुजर पाटलाची कुणबी स्त्रीला बेइज्जत केल्याप्रकरणी शिवरायांकडे पहिले प्रकरण न्याय निवाडा करण्यासाठी आले.याच पासलकर वाड्यातून शिवरायांनी त्या गुजर पाटलाचे हातपाय कलम करून त्याचा चौरंगा करण्याचे पहिल्या शिक्षेचे फर्मान देऊन स्त्री जातीचा सन्मान हे स्वराज्य करेल असा निरोप सर्वच पाटील आणि सरंमजामशहा यांना देण्यात आला.आता तरी जातीला आपले संरक्षण करणारे स्वराज्य आल्यासारखे वाटू लागले.त्यामुळे स्वराज्यात पासलकर घराण्याला खूप मोठे महत्व प्राप्त होते.पासलकर वाड्यात वर्षभर राज्यकारभार माता जिजाऊच्या मार्गदर्शनाखाली चालविला

No comments:

Post a Comment