Friday, 3 November 2017

भाग क्र.३ स्वराज्याचा खरा इतिहास....लाल महालावर शनिवार वाड्याचा कब्जा.....!

भाग क्र.३
स्वराज्याचा खरा इतिहास....लाल महालावर शनिवार वाड्याचा कब्जा.....!
स्वराज्य संकल्पक शहाजीराजे यांनी पुणे परगण्यात १६१६ मध्ये स्वराज्यासाठी “लाल महाल” बांधला.
पुणे परगणा आणि सुपा परगणा हा मालोजी भोसले यांचे ताब्यात असल्यामुळे या प्रांतातील गडकरी यांचे सलोख्याचे सबंध होते....आणि यातच प्रचंडगडाचे परवारी यांचे त्यांचे घनिष्ट संबध होते.शहाजीराजे अभ्यासू असल्यामुळे त्यांना भगवा ध्वज संदर्भात अभिमान होता.शहाजीराजे यांना हेच भगवे निशाण असलेले स्वराज्य प्रस्थापित करायचे होते तसे त्यांनी “तुळापुर” येथे संकल्प केला होता.मालोजी भोसले यांच्या ताब्यात असणारा पुणे परगणा शहाजीराजे यांच्या ताब्यात आले.याच पुणे प्रांतातून स्वराज्य निर्माण कराण्याचा त्यांचा हेतू होता....यासाठी त्यांनी पूर्व तयारीनिशी सुरुवात केली होती. “राशीन” हे गाव त्यावेळी निजामशाहीत होते...आणि शहाजीराजे निजामशाहीत या संपूर्ण भागावर त्यांचा कब्जा होता.राशीनचे “बांगर” यांचेकडून पुणे येथे साल १६१६ – १६१७ मध्ये “लाल महाल” बांधून घेतला....लाल महाल हा सात तळ्याची माडी होती.झांबरे पाटील हे शहाजी राजांचे पाटील होते.....तो महाल झांबरे पाटलाच्या ताब्यात देऊन त्या लाल महालाच्या ताब्यातील येणाऱ्या प्रांताचा महसूल गोळा करून लाल महालाची व्यवस्था पाहण्याची जबाबदारी झांबरे पाटलावर सोपविण्यात आली.झांबरे पाटील त्याची व्यवस्था जबाबदारीने पार पाडीत होता.


No comments:

Post a Comment