Friday, 3 November 2017

भाग क्र.१० स्वराज्याचा खरा इतिहास....लाल महालावर शनिवार वाड्याचा कब्जा.....!

भाग क्र.१०
स्वराज्याचा खरा इतिहास....लाल महालावर शनिवार वाड्याचा कब्जा.....!
लाल महालातून माता जिजाऊचे मार्गदर्शनाखाली स्वराज्याचा कारभार सुरु....!
लाल महालाच्या संरक्षणासाठी होते.... झुंजारराव मरळ – दाभाडे – फिरंगोजी नरसाळा....!
पासलकर वाड्यात वर्षभर राज्यकारभार चालविल्यानंतर माता जिजाऊ १६४६ मध्ये लाल महालात आल्या.माता जिजाऊनी लाल महालातून १६५६ पर्यंत म्हणजे १० वर्ष राज्य कारभार पहिला.....माता जिजाऊ यांचे बरोबर झुंजारराव मरळ – दाभाडे – फिरंगोजी नरसाळा अशी प्रमुख लोक त्यांचे बरोबर होती.त्यानंतर राजगडाला स्वराज्याची पहिली राजधानी म्हणून तेथून स्वराज्याचा कारभार सुरु केला होता.राजगडाच्या पायथ्याशी असलेल्या पाली गावात माता जिजाऊ यांचेसाठी वाडा बांधण्यात आला होता.१६५६ साली माता जिजाऊ राजगडला आल्यानंतर लाल महाल पुन्हा झांबरे पाटलाच्या ताब्यात देण्यात आला.१६५६ पासून ते १६७४ पर्यंत माता जिजाऊ राजगडा जवळच होत्या.राजगडामधून राज्य कारभाराची सुरुवात झाली होती.

भाग क्र.९ स्वराज्याचा खरा इतिहास....लाल महालावर शनिवार वाड्याचा कब्जा.....!

भाग क्र.९
स्वराज्याचा खरा इतिहास....लाल महालावर शनिवार वाड्याचा कब्जा.....!
स्वराज्यातील पहिले शिक्षेचे फर्मान...पासलकर वाड्याला अगण्य महत्व........!
रांझाच्या गुजर पाटलाचे हातपाय कलम करून त्याचा केला चौरंगा....!
आता शिवरायांनी स्वराज्याचा पहिला कारभार माता जिजाऊच्या मार्गदर्शनाखाली पासलकर वाड्यातून सुरु केला.तेव्हा राझांच्या गुजर पाटलाची कुणबी स्त्रीला बेइज्जत केल्याप्रकरणी शिवरायांकडे पहिले प्रकरण न्याय निवाडा करण्यासाठी आले.याच पासलकर वाड्यातून शिवरायांनी त्या गुजर पाटलाचे हातपाय कलम करून त्याचा चौरंगा करण्याचे पहिल्या शिक्षेचे फर्मान देऊन स्त्री जातीचा सन्मान हे स्वराज्य करेल असा निरोप सर्वच पाटील आणि सरंमजामशहा यांना देण्यात आला.आता तरी जातीला आपले संरक्षण करणारे स्वराज्य आल्यासारखे वाटू लागले.त्यामुळे स्वराज्यात पासलकर घराण्याला खूप मोठे महत्व प्राप्त होते.पासलकर वाड्यात वर्षभर राज्यकारभार माता जिजाऊच्या मार्गदर्शनाखाली चालविला

भाग क्र.८ स्वराज्याचा खरा इतिहास....लाल महालावर शनिवार वाड्याचा कब्जा.....!

भाग क्र.८
स्वराज्याचा खरा इतिहास....लाल महालावर शनिवार वाड्याचा कब्जा.....!
स्वराज्याची शपथ.....पासलकर वाड्यात.....!
स्वराज्याचे पहिले तोरण....तोरणागडाचा पहिला गडकरीचा मान मिळाला यल्ल्या मांगाला....!
यलोजी बुवाचा....चांग भले...चांग भले.....चांग भले......!
तोरण चढविले नंतर वीर बाजी पासलकर आणि परवरी यांनी आपली विश्वासू लोक तोरणागडावर ठेऊन ते सर्व शिवराया सोबत पासलकर वाड्यात आले.त्यांचे बरोबर आता स्वराज्याची योजना आखण्यासाठी १२ मावळे बरोबर होते. वीर बाजी पासलकर (शिवगंगा खोरे) - नेताजी पालकर (पाली-भोर) - शेलार मामा (बोरड – हिरडूस मावळ) - यल्ल्या मांग (मांग दरी गुंजन मावळा) - गणोजी शिर्के (मोसे खोरे) - रायनाक परवारी (प्रचंडगड – बारा गाव घेरे) -झुंजारराव मरळ (मुठे खोरे) -हैबतराव शिळीमकर (गुंजन मावळा) - शिंदे (शिकेकरी) (गुंजन मावळा) - सपकाळ (अठरा गाव मावळ) यांना बरोबर घेऊन पासलकर वाड्यातून स्वराज्याचा पहिला राज्यकारभार सुरु केला.पासलकर वाड्याची सुरक्षतेची जबाबदारी अत्यंत प्रामाणिकपणे यल्ल्या मांगाने पार पडल्यामुळे शिवरायांनी तोरणागडाची जबाबदारी यल्ल्या मांगावर सोपविण्याचे ठरविले पहिला किल्लेदार म्हणून गडकरी असल्याचा पहिला मान यल्ल्या मांगाला दिला.त्याने तोरणागडाच्या पायथ्याशी पहिली बाजार पेठ उभी केली.आज त्या बाजार पेठेला यल्याची पेठ म्हणून ओळखले जाते.पुढे त्याचा मृत्यू कसा झाला याबाबत अनेक भिन्नता आहेत....मात्र आजही तोरणागडाच्या प्रवेशव्दारा जवळ त्याची समाधी आहे. तोरणागडात प्रवेश करताना आजही लोक “यलोजी बुवाचा....चांग भले” असे म्हणत प्रवेश करीत असतात.

भाग क्र.७ स्वराज्याचा खरा इतिहास....लाल महालावर शनिवार वाड्याचा कब्जा.....!

भाग क्र.७
स्वराज्याचा खरा इतिहास....लाल महालावर शनिवार वाड्याचा कब्जा.....!
प्रचंडगडाचे गडकरी....परवारी स्वराज्यात दाखल........!
प्रचंडगड स्वराज्याच्या ताब्यात.....यल्ल्या मांगाच्या हातून चढविले पहिले तोरण “तोरणगड”
साल १६४३ – १६४४ दरम्यान पासलकर वाड्यात आलेनंतर तेथे शिवरायांची मांग दरीतील यल्ल्या मांग याच्या बरोबर ओळख झाली.यल्ल्या मांग याचेकडे पासलकर वाड्याचे संरक्षण करण्याची जबाबदारी होती.ठरल्याप्रमाणे बाल शिवराय आणि वीर बाजी पासलकर – नेताजी पालकर – शेलार मामा – यल्ल्या मांग हे प्रंचडगडा जवळ गेले.शिवराय शेलारमामा आणि यल्ल्या मांगाला बरोबर घेऊन गडाच्या खालीच थांबले. वीर बाजी पासलकर – नेताजी पालकर लखोटा घेऊन प्रचंडगडाच्या गडकरी असणारे परवारी यांचेकडे गेले.शहाजीराजे यांचा लखोटा त्यांनी त्यांच्याकडे दिला....त्यांनी स्वराज्यासाठी गड स्वाधीन केल्याचे जाहीर केले.शिवरायांना निरोप देण्यात आला.शिवराय शेलारमामा आणि यल्ल्या मांगाला बरोबर घेऊन गडावर गेले अवघ्या १४ वर्षाच्या मुलाने प्रचंडगडाचा ताबा घेतला आणि स्वराज्याचे पहिले भगवे निशाण यल्ल्या मांगाच्या हातुन चढवून घेतले.स्वराज्याचे पहिले तोरण म्हणून प्रचंडगडाचे नामकरण “तोरणागड” असे केले.

भाग क्र.६ स्वराज्याचा खरा इतिहास....लाल महालावर शनिवार वाड्याचा कब्जा.....!

भाग क्र.६
स्वराज्याचा खरा इतिहास....लाल महालावर शनिवार वाड्याचा कब्जा.....!
शहाजीराजे यांनी शिवरायांच्या हातात दिले स्वराज्याचे भगवे निशाण....!
स्वराज्यात पासलकर वाड्याचे महत्वाचे योगदान........!
आता स्वराज्य स्थापनेची वेळ आली होती प्रचंडगडाचे गडकरी परवारी यांचे भोसले घराण्याचे सलोख्याचे संबध असल्यामुळे स्वराज्याच्या संकल्पने संदर्भात शहाजीराजे आणि परवारी यांचे एकमत झाले होते.शहाजीराजे यांनी ठरल्याप्रमाणे....परवारी यांचे नावाने लखोटा तयार करून तो वीर बाजी पासलकर यांच्याकडे दिला. गौतम बुध्दापासून ते संत नामदेव महाराज यांचेपर्यंत भगवे निशाण चालत आले होते.१२ ते १५ व्या शतकापर्यंत म्हणजे संत नामदेव महाराजा नंतर भगव्या निशाणाला मरगळ आली होती.नामदेव महाराजांची विचारधारा सर्वत्र प्रचलित झाली होती.म्हणूनच भगवे निशाण पुन्हा एकदा स्वराज्याचा भगवा ध्वज म्हणून शिवरायांच्या हातामध्ये दिला.माता जिजाऊ – बाल शिवराय – वीर बाजी पासलकर – नेताजी पालकर – शेलार मामा यांना पुणे येथील शिवगंगा खोरे (खेड शिवापूर) पासलकर वाड्यामध्ये पाठविले.

भाग क्र.५ स्वराज्याचा खरा इतिहास....लाल महालावर शनिवार वाड्याचा कब्जा.....!

भाग क्र.५
स्वराज्याचा खरा इतिहास....लाल महालावर शनिवार वाड्याचा कब्जा.....!
वीर बाजी पासलकर,नेताजी पालकर आणि शेलारमामा याचे मोलाचे योगदान....शिवरायांना दिले शस्त्र चालविण्याचे प्रशिक्षण.....लाल महाल पुन्हा ताब्यात....!
शिवनेरी वर ११ एप्रिल १६३० मध्ये शहाजीराजे आले....आणि त्यांनी शिवरायांचे मुखदर्शन केले.१६३६ पर्यंत शिवरायांचे खेळणे बागडणे शिवनेरी गडावर झाले.१६३६ मध्ये स्वराज्याचे प्रशिक्षण घेण्यासाठी शहाजीराजे यांनी बाल शिवरायांना गोवळकोंड्याला पाठविले. गोवळकोंड्यात शिवरायांचे माता जिजाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली वीर बाजी पासलकर,नेताजी पालकर आणि शेलारमामा यांच्याकडून युध्द शास्त्रनीतीचे शिक्षण सुरु झाले. शहाजीराजे आदिलशाहीत असल्यामुळे तसेच पुणे परगणा शहाजीराजे यांचा असल्यामुळे आदिलशहाने पुणे येथे १६३६ मध्ये सैन्य पाठवून लाल महाल ताब्यात घेतला.सुप्यावरून झांबरे पाटील पुन्हा लाल महालात आले.


भाग क्र.४ स्वराज्याचा खरा इतिहास....लाल महालावर शनिवार वाड्याचा कब्जा.....!

भाग क्र.४
स्वराज्याचा खरा इतिहास....लाल महालावर शनिवार वाड्याचा कब्जा.....!
माता जिजाऊ स्वराज्यात दाखल..शिवरायांचा जन्म झाला....!
आणि स्वराज्यावर आर्यांचा पहिला हल्ला झाला.....!
साल १६२२ मध्ये लखुजी जाधव यांची कन्या जिजाऊ यांचे बरोबर शहाजीराजे यांचे लग्न झाले... त्यांच्या लग्नात ब्राह्मण नव्हता हे मात्र निश्चित आहे.शहाजीराजे यांना पहिला मुलगा झाला त्याचे नाव त्यांनी “संभाजी” ठेवले.शहाजीराजे साल १६२४ मध्ये आदिलशाहित सामील झाले.....लाल महाल बांधल्यामुळे निजामाच्या असे लक्षात आले होते की,शहाजीराजे स्वत:च्या राज्याची तयारी करीत आहे आणि हे सर्व तो समजवून घेत होता.शहाजीराजे यांना दुसरा मुलगा झाला त्याचे नाव त्यानी “जयसिंग” ठेवले.जेव्हा निजामच्या शहाजीराजे यांची चाल लक्षात आली....तेव्हा त्यांनी त्यांचा ब्राह्मण सरदार “मुरार जगदेव” याला लाल महालावर हल्ला करण्याचे आदेश दिले होते.स्वराज्याचा दिवस उगविला शहाजीराजे यांना तिसरा मुलगा झाला त्याचे नाव “शिवाजी” ठेवण्यात आले....म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवनेरी किल्ल्यावर १९ फ्रेब्रुवारी १६३० मध्ये जन्म झाला.२ मार्च १६३० चा दिवस उगवला स्वराज्याचा पहिला विरोधक वैदिक धर्म पंडित निजामाचा सरदार “मुरार जगदेव” याने पुणे परगण्यात असणाऱ्या लाल महालावर पहिला हल्ला केला. छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म होऊन जेमतेम १०-१२ दिवस झाले असतील.....आणि वैदिक धर्म पंडिताचा हल्ला झाला.त्यावेळी शहाजीराजे कर्नाटक येथील बेगलोर मध्ये होते.लाल महालावर पहिला वैदिक धर्म पंडित ताबा मारून बसला त्याने पुणे बेचीराग करून टाकले.....साल १६३० ते १६३६ पर्यंत लाल महालावर ब्राह्मण “मुरार जगदेव” थांड मारून बसला होता.हल्ला झाल्यावर झांबरे पाटलाने सुपा परगणा गाठला.