Sunday, 15 May 2016

"संभाजी राजे यांची संघर्ष गाथा " कुळवाडी भुषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवरायांची हत्या..........


"संभाजी राजे यांची संघर्ष गाथा " कुळवाडी भुषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवरायांची हत्या....भाग १ }

जिजाऊ प्रकाशन यांनी प्रकाशित केलेले लेखक चंद्रशेखर शिखरे यांचे "संभाजी राजे यांची संघर्ष गाथा " हे चित्रमय पुस्तक वाचले. हे पुस्तक वाचत असताना मध्ययुगीन भारताच्या इतिहासाची अनमोल अशी माहिती मला मिळाली. मानवा प्रती संताची भूमिका भावना याचे दर्शन झाले. त्यामधिल चित्राच्या माध्यमातून एक बोलक्या प्रतिक्रिया अनुभवयाला मिळत होत्या.भारतातील जैन- बौध्द धर्माची माहिती मिळाली. भारत हा स्त्री प्रधान देश होता याची माहिती मिळाली. परंतु भट बामनांचा इतिहास वाचत असताना मन हेलाऊन गेले हे भट बामन इतके क्रुर होते याचे दर्शन या लेखकाने केले आहे. अंगावर तर शहारे आलेच पण या भट बामनांचा रागही तेवढा आला आहे. कारण या पुस्तकात असे लिहिले आहे की,रायगडावर छत्रपती शिवरायांची हत्या याच भट बामनांनी केली आहे. कुळवाडी भुषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवरायांचे अंत्य दर्शन या बहुजन समाजाला होऊ दिले नाही आपल्या पोटचा मुलगा युवराज संभाजी राजे भोसले यांना होऊ दिले नाही. त्यांचा अत्यंविधी न करता त्यांना भडाग्नी देऊन त्यांचा देह मातीत याच भट बामनांनी विलीन केला आहे. अशा इतिहासाची माहिती "संभाजी राजे यांची संघर्ष गाथा " या पुस्तकाने दिली आहे. क्रमश:


भाग २ } 

छत्रपती शिवाजी महाराजांचा अत्यंसंस्कार भट बामानानी होऊ दिला नाही याचे कारण काय ? असाही प्रश्न मला हे पुस्तक वाचताना पडला त्याचे उत्तर मला या "संभाजी राजे यांची संघर्ष गाथा " ह्या पुस्तकामध्ये आढळुन आला नाही. नेमके छत्रपती शिवाजी महाराजांचा अत्यंसंस्कार जर झाला असता तर तो कोणत्या संस्कारा प्रमाणे किंवा धर्माप्रमाणे झाला असता याचे उत्तर या पुस्तकाचे लेखक चंद्रशेखर शिखरे यांनी द्यावे असे या प्रतिक्रियाव्दारे मी त्यांना निवेदन करीत आहे. कारण धर्मा शिवाय कोणता राजा नाही संस्कारा शिवाय कोणते कुटुंब नाही. मला या पुस्तका नुसार जे आकलन झाले आहे ते असे की त्याकाळी हिंदु नावाचा कोणाताही धर्म नव्हता त्याकाळी जैन बौध्द मुस्लिम आणि ख्रिश्चन तसेच शीख पंथ होता शाक्त नावाचा पंथ किंवा धर्म होता का नाही आणि याचे धर्म असे विश्लेषण करता येईल काय ? असाही प्रश्न याठिकाणी उपस्थित झाला आहे याचे उत्तर लेखक चंद्रशेखर शिखरे यांनी दिले पाहिजे. हे पुस्तक प्रकाशन करण्यासाठी त्यांनी दहा वर्षाची मेहनत घेतली आहे. तसेच भट बामनांचा त्याकाळी वैदिक धर्म होता असे म्हटले जाते हे जरी सत्य असले तरी एक सत्य मला उलगडले नाही त्या काळाची जनता कोणत्या धर्माचे आचरण करत होती हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. संशोधक आणि इतिहासकार याचे काय विश्लेषण करतात हे आजच्या तरुणांना माहित हवे. क्रमश: 

भाग ३ }

या पुस्तकात लेखक असे म्हणतो की छत्रपती शिवरायांनी पहिला राज्याभिषेक वैदिक पद्धतीत रायगड याठिकाणी ६ जून १६७४ मध्ये माता जिजाऊ यांच्या साक्षीने केला. मात्र हा राज्याभिषेक झाल्या नंतर लगेचच १२ दिवसांनी माता जिजाऊ यांचे निधन झाले त्यानंतर महाराज अस्ताव्यस्त झाले. काही लोकांनी त्यांना वैदिक पद्धतीचा राज्याभिषेक मानवीला नसल्याचे सांगितले. त्यामुळे महाराजांनी गुप्त पद्धतीत दुसरा राज्याभिषेक २० सप्टेंबर १६७४ रोजी शाक्त धर्मा प्रमाणे गोसावी यांच्या हस्ते तांत्रिक पध्दती मध्ये केला असे लेखकांने म्हटले आहे. परंतु असे कोठेही महापुरुषांनी किंवा इतिहासकारांनी किंवा संशोधक यांनी म्हटल्याचे मला कोठेही सापडलेले नाही. कारण माता जिजाऊनी महाराजांना अंधश्रध्देकडे वळविले नव्हते त्यामुळे महाराजांनी तांत्रिक पद्धतीत तो राज्यभिषेक केलेला नाही असे स्वराज्य प्रेमी शिवपाईक म्हणुन वाटते. सदरच्या पुस्तकामध्ये लेखक असे म्हणतो की शिवरायांनी शाक्त पद्धतीचा राज्यभिषेक गुप्तपणे केला होता. परंतु मला तसे वाटत नाही कारण छत्रपती शिवराय शूर धाडसी पराक्रमी जनतेचे राजे होते भीती नावाचा शब्दही त्यांच्या जवळ येत नव्हता मग नेमके या लेखकाला काय सांगायचे आहे असा प्रश्न माझ्या समोर उभा राहिलेला आहे. का सदरचा राज्याभिषेक धर्म लेखकाला वाचका पासुन लपवून ठेवायचा आहे. कारण शाक्त धर्माचे खरे विश्लेषण जो पर्यंत लेखक आपल्या समोर जो आणित तो पर्यंत सदरच्या प्रश्नाचे गुढ कायम राहील आणि आपल्या सर्वांचा संभ्रम कायम राहील. क्रमश:

भाग ४ } 


परंतु सदर पुस्तकाचे वाचन केल्यानंतर काही ठिकाणी शाक्त धर्माचे पुरावे मला सापडले ते मी याठिकाणी देत आहे. "संभाजी राजे यांची चित्रमय संघर्ष गाथा"जिजाऊ प्रकाशन लेखक चंद्रशेखर शिखरे यांनी जरी त्यांच्या या पुस्तकात शाक्त धर्माचे खरे विश्लेषण केले नसले तरी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले पुस्तक "शुद्र पूर्वी कोण होते" तसेच कृ.अ. केळुसकर गुरुजी यांनी लिहिलेले "शिवचरित्र" हे पुस्तक आणि कॉ. शरद पाटील यांनी लिहिलेल्या "शिवरायांचे खरे शत्रू महंमदी की ब्राम्हणी" या पुस्तकात शाक्त धर्माचे खालील प्रमाणे विश्लेषण केले आहे.
दिवशी छत्रपती शिवाजी महाराज अधिकृत रयतेचे राजा झाले. त्या दिवसाला महाराष्ट्रात एक आगळे-वेगळे महत्त्व आहे. ६ जून १६७४ रोजी किल्ले रायगड येथे शिवाजी महाराजांचा पहिला राज्याभिषेक संपन्न झाला. बाबासाहेब आंबेडकरांनी "शुद्र पूर्वी कोण होते" हा ग्रंथ ओबीसी-कुणबी-मराठा या वर्गासाठी लिहिलेला आहे. याच पुस्तकात बाबासाहेबांनी शिवाजी महाराजांविषयी अतिशय संशोधनात्मक स्वरुपात शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे सखोल संशोधन केलेलं आहे. ज्या दिवशी शिवरायांचा राज्याभिषेक झाला, तेव्हापासून शिवरायांनी नवीन शक सुरु केले. त्याला "राज्याभिषेक शक" म्हणून ओळखले जाते. पण हे शक फार काळ टिकू शकले नाही. जोपर्यत शिवशाहीचे राज्य होते तोपर्यंतच हे शक पाळले गेले. शिवशाहीचा अस्त होऊन जेव्हा ब्राम्हण-पेशव्यांच्या हातात सत्ता आली. तेव्हा पेशव्यांनी असा हुकुम जाहिर केला की…"शिवशक बंद करून मोगल बादशहाचे फसली शक सरू करावे"
६ जून १६७४ रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक "वैदिक" पद्धतीत संपन्न झाला. पण असे करतांना काशीच्या गागाभट्ट या वैदिक-ब्राम्हण पुरोहिताने राज्याभिषेकात "वेदोक्त मंत्रपठण" न करता "पुराणोक्त मंत्र" पठन करून शिवरायांना "क्षत्रिय" मानण्यास नकार दिला. व शिवरायांना "शुद्र" घोषित केले गेले. या सर्व अपमानास्पद वागणुकीनंतर शिवरायांनी या छळाचा बदला घेण्याचे ठरविले. त्यानुसार शिवबांनी २४ सप्टेंबर १६७४ रोजी रायगड येथे दुसरा राज्याभिषेक "अवैदिक-शाक्त" पद्धतीत साजरा केला. ६ जून १६७४ ते २४ सप्टेंबर १६७४ या काळात शिवाजी महाराज कधीच राजसिंहासनावर बसले नाहीत. त्यांनी सर्व वैदिक परंपरा नाकारल्या.
वैदिक-ब्राम्हणी धर्माच्या विषमतावादी तत्त्वज्ञाला विरोध करण्यासाठी शिवरायांनी शाक्त धर्माची दिक्षा घेतली. शिवाजी महाराजांच्या अगोदर संभाजी महाराजांनी शाक्त धर्माची दिक्षा घेतली होती. कारण संभाजी महाराजांचे सासरे पिलाजी शिर्के हे शाक्त-धर्माचे होते. पिलाजी शिर्के मुळचे शृंगारपुरचे निवासी होते. संभाजी महाराजांनी आवैदिक-शाक्त धर्माचा अभ्यास करण्यासाठी शिवरायांनी त्यांना शृंगारपुर येथे ठेवले होते. शृंगारपुर हे शाक्तांचे एक प्रभावी केंद्र होते. शाक्त तत्वज्ञानी "शिवयोगी" यांनी शृंगारपुरला शाक्त-धर्मपीठ स्थापन करून शाक्त धर्माच्या प्रचारास सुरुवात केली. संभाजी राजांचा विरोध करणारे प्रामुख्याने वैदिक-ब्राम्हण होते. त्यामुळे त्यांचा बिमोड करणे संभाजीराजांचे पहिले कर्तव्य होते.
शिवकालीन वज्रयान गुह्य समाज (गुप्त समाज) या बौद्ध तंत्र संप्रदायातून विकसित झालेल्या शाक्त-धर्माची शिवरायांनी दिक्षा घेतली. या धर्मानुसार शाक्त-दिक्षा घेतल्यावर अस्पृश्य स्त्रीशी शैव-विवाह शिवरायांनी केला होता. पहिले शिवचरित्रकार कृ.अ. केळुसकर गुरुजींनी पृ. ४१०-११ च्या तळटिपेत या विषयी लिहिले आहे.
संदर्भ :- शुद्र पूर्वी कोण होते -> डॉ. बाबासाहेब आंबेडकर
शिवरायांचे खरे शत्रू महंमदी की ब्राम्हणी :-> कॉ. शरद पाटील
शिवचरित्र :-> कृ.अ. केळुसकर गुरुजी

भाग ५ }

छत्रपती शिवरायांनी वैदिक धर्म पध्दतीत केलेला रायगडा वरील राज्याभिषेक नाकारला होता आणि शाक्त पध्दतीमध्ये दुसरा राज्याभिषेक करून घेतला होता. याचाच राग भट बामनांना आला होता आणि त्यामुळेच नियोजित पध्दतीत त्यांनी  छत्रपती शिवरायांची हत्या केली.या पुस्तकाचे वाचन केले आणि त्यातील चित्र पाहिले तर हे लक्षात येते लेखकाने हे चित्रमय पुस्तक खूप हिमतीने लिहिले आहे. हे पुस्तक वाचल्यानंतर मन अत्यंत हेलावून जाते  या भट बामनांचे हे क्रुर कृत्य वाचून यातील चित्रमय गाथा वाचल्या नंतर मनाला खुप दु:ख होते. भट बामनांचा खूप खूप राग येतो. परंतु त्याहूनही जास्त असा राग येतो की,आजही ही भट बामन माता जिजाऊ, संभाजी राजे आणि  कुंभी नी स्त्रीची बदनामी बदनामी करणारे भट बामन यांना पुरस्कार दिला जातोय. क्रमश:
राजेश खडके 

Thursday, 21 April 2016

छत्रपती शिवाजी व संभाजी महाराजांनी केले शाक्त धर्मांतर :- एक संशोधन

ज्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज अधिकृत रयतेचे राजा झाले. त्या दिवसाला महाराष्ट्रात एक आगळे-वेगळे महत्त्व आहे. ६ जून १६७४ रोजी किल्ले  रायगड येथे शिवाजी महाराजांचा पहिला राज्याभिषेक संपन्न झाला. बाबासाहेब आंबेडकरांनी "शुद्र पूर्वी कोण होते" हा ग्रंथ ओबीसी-कुणबी-मराठा या वर्गासाठी लिहिलेला आहे. याच पुस्तकात बाबासाहेबांनी शिवाजी महाराजांविषयी अतिशय संशोधनात्मक स्वरुपात शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे सखोल संशोधन केलेलं आहे. ज्या दिवशी शिवरायांचा राज्याभिषेक झाला, तेव्हापासून शिवरायांनी नवीन शक सुरु केले. त्याला "राज्याभिषेक शक" म्हणून ओळखले जाते. पण हे शक फार काळ टिकू शकले नाही. जोपर्यत शिवशाहीचे राज्य होते तोपर्यंतच हे शक पाळले गेले. शिवशाहीचा अस्त होऊन जेव्हा ब्राम्हण-पेशव्यांच्या हातात सत्ता आली. तेव्हा पेशव्यांनी असा हुकुम जाहिर केला की…"शिवशक बंद करून मोगल बादशहाचे फसली शक सरू करावे"

६ जून १६७४ रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक "वैदिक" पद्धतीत संपन्न झाला. पण असे करतांना काशीच्या गागाभट्ट या वैदिक-ब्राम्हण पुरोहिताने राज्याभिषेकात "वेदोक्त मंत्रपठण" न करता "पुराणोक्त मंत्र" पठन करून शिवरायांना "क्षत्रिय" मानण्यास नकार दिला. व शिवरायांना "शुद्र" घोषित केले गेले. या सर्व अपमानास्पद वागणुकीनंतर शिवरायांनी या छळाचा बदला घेण्याचे ठरविले. त्यानुसार शिवबांनी २४ सप्टेंबर १६७४ रोजी रायगड येथे दुसरा राज्याभिषेक "अवैदिक-शाक्त" पद्धतीत साजरा केला. ६ जून १६७४ ते २४ सप्टेंबर १६७४ या काळात शिवाजी महाराज कधीच राजसिंहासनावर बसले नाहीत. त्यांनी सर्व वैदिक परंपरा नाकारल्या.

वैदिक-ब्राम्हणी धर्माच्या विषमतावादी तत्त्वज्ञाला विरोध करण्यासाठी शिवरायांनी शाक्त धर्माची दिक्षा घेतली. शिवाजी महाराजांच्या अगोदर संभाजी महाराजांनी शाक्त धर्माची दिक्षा घेतली होती. कारण संभाजी महाराजांचे सासरे पिलाजी शिर्के हे शाक्त-धर्माचे होते. पिलाजी शिर्के मुळचे शृंगारपुरचे निवासी होते. संभाजी महाराजांनी आवैदिक-शाक्त धर्माचा अभ्यास करण्यासाठी शिवरायांनी त्यांना शृंगारपुर येथे ठेवले होते. शृंगारपुर हे शाक्तांचे एक प्रभावी केंद्र होते. शाक्त तत्वज्ञानी "शिवयोगी" यांनी शृंगारपुरला शाक्त-धर्मपीठ स्थापन करून शाक्त धर्माच्या प्रचारास सुरुवात केली. संभाजी राजांचा विरोध करणारे प्रामुख्याने वैदिक-ब्राम्हण होते. त्यामुळे त्यांचा बिमोड करणे संभाजीराजांचे पहिले कर्तव्य होते.

शिवकालीन वज्रयान गुह्य समाज (गुप्त समाज) या बौद्ध तंत्र संप्रदायातून विकसित झालेल्या शाक्त-धर्माची शिवरायांनी दिक्षा घेतली. या धर्मानुसार 
शाक्त-दिक्षा घेतल्यावर अस्पृश्य स्त्रीशी शैव-विवाह शिवरायांनी केला होता. पहिले शिवचरित्रकार कृ.अ. केळुसकर गुरुजींनी पृ. ४१०-११ च्या तळटिपेत या विषयी लिहिले आहे.                                                                      

संदर्भ :-   शुद्र पूर्वी कोण होते ->  डॉ. बाबासाहेब आंबेडकर
               शिवरायांचे खरे शत्रू महंमदी की ब्राम्हणी :-> कॉ. शरद पाटील
               शिवचरित्र :-> कृ.अ. केळुसकर गुरुजी         

Friday, 1 April 2016

मराठी काव्य अनुवाद

जय जिजाऊ,
छत्रपती संभाजीराजे लिखित "बुधभूषण "या संस्कृत ग्रंथाचा मराठी काव्य अनुवाद इतिहासात पहिल्यांदाच मला करता आला याचा सार्थ अभिमान वाटतो, शिवमती. शैलजाताई ज्ञानेश्वर मोळक यांनी संपादक म्हणून अथक परिश्रमाद्वारे" बुधभूषण "ग्रंथ आपल्याला इतिहासात पहिल्यांदाच आणून अद्वितीय, महनीय शिवकार्य केले त्यास तोड नाही. ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. प्रभाकर ताकवले सरांनी "बुधभूषण "हा ग्रंथ संस्कृत मधून अतिशय प्रभावी पध्दतीने मराठीत अनुवाद केला, हया एैतिहासिक ग्रंथातील निवडक कौवणांचा मराठी काव्य अनुवाद करता आला ते केवळ सदर ग्रंथ संपादक शैलजाताई ज्ञानेश्वर मोळक व ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. प्रभाकर ताकवले सरांनी अनुवाद केल्यामुळेच मला "बुधभूषण " ग्रंथाचा मराठी काव्य अनुवाद करता आला हे विनम्र पणे कबूल करतो,शैलजाताई ज्ञानेश्वर मोळक व डॉ. प्रभाकर ताकवले सरांना लाख लाख घन्यवाद देतो",बुधभूषण "हा मराठी काव्य अनुवाद केलेला ग्रंथ लवकरच आपल्या भेटीस येत आहे.
बुधभूषण
शरद गोरे
मराठी काव्य अनुवाद
९९२२९८६३८६


Tuesday, 24 November 2015

संविधान




२६ नोव्हेंबर १९४९ रोजी स्वातंत्र देशाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान प्रधान केले. भारत देशाच्या प्रत्येक नागरिकांच्या घरा घरात भारतीय संविधान पोहचले पाहिजे हा उदात्त हेतू घेऊन आम्ही बरेच वर्षापासून कार्य करीत आहोत आणि त्या बाबत जनजागृती शासनाने करावी अशी मागणी आम्ही वारंवार करीत आलो त्याला यश आले असुन तसे परिपत्रक काढले गेले आहे. त्यामुळे आम्ही मनापासून आभार व्यक्त करीत आहोत
                                                                                                                           अध्यक्ष
                                                                                                           प्रचार प्रसार प्रसिद्धी व माहिती संस्थान

Tuesday, 11 August 2015

चला अलिबागला...सरखेल कान्होजी आंग्रे जाणून घ्यायला...

सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या पुण्यतिथीनिमित्त विशेष लेख :
पर्यटन म्हटले की किल्ले, थंड हवेची ठिकाणे पाहणे... तेथे भेट देणे... आरामात मुक्काम करणे... आणि तेथून निघून येणे, एवढेच. पण आम्हास असे वाटते की, पर्यटनाला जरुर जा. तेथील किल्ले, समुद्र किनारे जरुर पहा आणि तेथील माहिती जाणून घ्या. आपण ज्या स्थळांना भेट देतो. तेथील इतिहास जाणून घ्या तरच ते खरे पर्यटन होऊ शकेल. शनिवार दिनांक ४ जुलै २०१५... अशाच एका शूरवीराचा हा स्मृती दिन. त्यानिमित्ताने जिल्हा रायगड, अलिबाग येथील सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या शौर्याचा, वीराचा हा इतिहास...


रस्त्याने अलिबाग हे मुंबईपासून अवघे १०० कि.मी. अंतरावर आहे. गेटवे ऑफ इंडियावरुन जलमार्गाने बोटीने अलिबागला पोहोचता येईल. रस्त्याने मात्र पनवेल-पेण-आणि अलिबाग असे अंतर सुमारे तीन तास प्रवासाने जाता येते. पनवेल-पेणहून अलिबाग हा चांगला रस्ता आहे. दोन्ही बाजुंनी हिरवीगार वनश्री. काजू, आंबा, फणस आणि विविध फुलांची झाडी याठिकाणी मन आकर्षून घेते. अलिबागला पनवेल-पेण रेल्वेने जाता येते. पनवेलपर्यंत लोकलने प्रवास करता येतो. तसा प्रवास सुखदायकच वाटतो. आपण अलिबाग शहरात बसस्थानकावर पोहोचलो की, अवघ्या ५ मिनिटाच्या अंतरावर सरखेल कान्होजी आंग्रे या शूरवीराची समाधी आहे. एकूण १० समाधी त्याठिकाणी आहेत. कान्होजी आंग्रे यांच्या मुख्य समाधीनंतर त्यांच्या कुटुंबातील आणखी मान्यवरांच्या समाधी याठिकाणी आपणास पाहावयास मिळतात. छत्रपतींच्या सुनबाई महाराणी ताराबाई यांच्या पश्चात कान्होजी आंग्रे यांच्या कार्याची प्रथम सुरुवात दिसून येते. बाळाजी विश्वनाथ पेशवे यांनी कान्होजी आंग्रे यांचे महत्व ओळखून त्यांना छत्रपती शाहू यांच्याकडे वळविले होते. सन १६९४ पासून कोकणात कान्होजी आंग्रे पराक्रमाने गर्जत होते.

राजाराम महाराजांच्यापासूनच कान्होजी उत्तम कार्य बजावत होते. कोकणची जहागीर मोघलांच्या जुलूमापासून जतन करण्यासाठी कान्होजींनी यश संपादन केले होते पण “सिद्धी” हा कान्होजींना त्रासदायक ठरत होता. ह्या सिद्धीने इंग्रजांची मदत घेतली आणि कान्होजी आंग्रे यांची सत्ता बुडविण्याकरिता प्रयत्न केले. पण कान्होजी आंग्रे यांच्यापुढे काहीही चालले नाही. आंग्रे यांच्या ताब्यात पुष्कळ प्रदेश व कित्येक किल्ले आहेत. त्यामुळे दर्यावर त्यांची भिती सगळ्यांनाच उत्पन्न झाली होती.

कान्होजी आंग्रे यांचा जन्मकाल उपलब्ध नाही. परंतु त्यांचा जन्म सन १६६९ च्या सुमारास झाला असावा. सन १६९४ मध्ये कान्होजींना सरखेल पदवी प्राप्त झाली होती. ते परिवारासह श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वराचे यात्रेस गेल्याचा उल्लेख मिळतो. कान्होजी यांचे बालपण जोशी-ब्राम्हण यांच्या घरी गुराखीपणाच्या चाकरीत गेले होते. त्यांनी १६९४ पासून १६९८ पर्यंत अवघ्या ४ वर्षांच्या काळात कोकणपट्टीतले एकूण एक किल्ले मोघलांकडून जिंकून आपल्या अंमलाखाली आणले होते. शिव छत्रपती शिवाजी महाराज यांचे चिरंजीव राजाराम यांनी कान्होजींना सुवर्णदुर्गावर नेमले. त्यांनी तेथून जंजिराच्या भागाकडे लक्ष दिले. काही किल्ले व ठाणी आपल्याकडे जिंकून घेतली. कान्होजींचा बांधा सुदृढ होता. पण ते अंगाने स्थूल होते. त्यांची मुद्रा भव्य होती. डोळे पाणीदार होते. ते आपल्याजवळील सरदारासमवेत अतिशय प्रेमाने वागत असत. त्यांच्या वागण्यात प्रेम वात्सल्य होते. पण त्यांची शिक्षा कडक असे. सन १६९८ मध्ये त्यांनी तळ कोकणचा बंदोबस्त उत्तमरितीने केला होता.

शंभुराजे यांच्या बलिदानानंतर मोघलांच्या अतिक्रमणापासून स्वराज्य संरक्षणाच्या उज्ज्वल काळात छत्रपती राजारामांना कान्होजी आंग्रे यांचे चांगले सहाय्य होते. छत्रपती राजाराम सन १७०० मध्ये सिंहगडावर मृत्यू पावले. पण तत्पूर्वीच कान्होजींनी 1697 मध्ये “कुलाबा” हे आपले मुख्य ठाणे केले होते. कोकण किनाऱ्याचे राजे म्हणून त्यांनी घोषणाही केली होती. राज्यात जमाबंदीला आरंभ केला होता. कान्होजी आंग्रे यांचे वडील तुकोजी आंग्रे होय. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांकडे उत्तम सेवा बजावली होती. शाहू महाराज आणि कान्होजी यांच्यामध्ये तह झाला. या तहाने 10 जंजिरे व १६ किल्ले कान्होजी आंग्रे यांना मिळाले होते. तसेच आंग्राची सत्ता कोकण किनाऱ्यावरील मांडवे ते त्रावणकोरपर्यंत पसरली. त्यामुळे शाहूराजे समाधानी होऊन त्यांनी बाळाजी विश्वनाथ यांना पेशवे पद दिले होते. शाहू छत्रपतीच्या दरबारात जंजीरकर सिद्दीच्या मोहिमेसंबंधात कान्होजी आंग्रेचा सल्ला घेण्यात आला होता. कान्होजींचे पश्चिम कोकण किनाऱ्यावरील वाढते यश, पोर्तुगीज, डच, फ्रेंच आणि विशेषत: इंग्रज यांना नकोसे वाटू लागले होते. त्यांनी संयुक्तरित्या कान्होजीबरोबर आरमारी लढाया केल्या होत्या. परंतु कान्होजीपुढे त्यांना अपयशच स्वीकारावे लागले होते. ब्रम्हेंद्र स्वामी धावडशीकर यांचा कान्होजी आंग्रे यांच्यासमवेत निकटचा संबंध होता.

कान्होजींची लष्करी व आरमारी सैन्याची शिस्त कौतुकास्पद होती. कान्होजींचे आरमार प्रबल होते. कान्होजींच्या आरमारामध्ये १५० पासून २०० टन वजनाची लढाऊ जहाजे व गलबते होती. ६ व ९ तोफाही होत्या. या प्रबळ आरमारावर निष्णात स्वामीनिष्ठ व संतोषी असे दर्यावर्दी लोकही होते. कोकण किनारा शत्रूपासून सुरक्षित ठेवण्याकरिता कान्होजींची नेमणूक छत्रपतींकडून व जास्त मान व सरखेल म्हणून अधिकृतरित्या केली गेली होती. म्हणून कोकण किनाऱ्याचे परकीय शत्रूपासून संरक्षण करणे हे कान्होजींचे कर्तव्यच होते, आंग्रे चाचे नव्हते. आंग्रे हे दर्यावरचे संरक्षक सत्ताधारी होते. कान्होजी आंग्रे यांचा मृत्यू मिती आषाढ वा.5 शके 1651 वार शुक्रवार दिनांक ४ जुलै १७२९ रोजी झाला. कान्होजी आंग्रे हे मनाने निर्मळ होते. स्वधर्मावर त्यांची जाज्वल्य निष्ठा होती. त्यांच्या सैन्यात यवन सरदारही होते. त्यांचे न्याय फैसले अत्यंत नि:पक्षपाती होते. त्यांनी एकूण ३६ वर्ष राज्य कारभार केला. ६० वर्ष त्यांना आयुष्य लाभले. उत्पन्न वाढवून त्यांनी राज्याला फायदा करुन दिला. प्रेम, वात्सल्य व ममता देऊन जनतेला सांभाळले. अलिबाग येथील नगरशेट मोदी, गुजर यांचे घराणे कान्होजींच्या वेळेपासून होते. बाहेरुन येणाऱ्या मालावर त्यांनी जकात बसविली. आपली स्वत:ची टाकसाळही सुरु केली. परमुलकी, वेसावे, केली लोकांची वसाहत श्रीबाग पेठ रामनाथ अलिबाग येथे आंग्रेनीच वसविली आहे. श्रीबागेतही एक समाधी आहे.

अलिबाग येथील त्यांच्या समाधीजवळ पत्नी मथुराबाई आंग्रे यांची समाधी आहे. कान्होजींना तीन पत्नी होत्या. मथुराबाई, लक्ष्मीबाई आणि गहिनाबाई. सेखोजी आंग्रे यांना तुकोजी, रायाची, आणि मावजी ही तीन मुले. तुकोजी यांचे कान्होजी आंग्रे हे पुत्र. कान्होजी मथुराबाई पत्नीपासून जयसिंग, संभाजी हे दोन पूत्र. लक्ष्मीबाईपासून मानाजी, तुकाजी दोन पूत्र आणि गहिनाबाईपासून येसाजी, धोडजी हे दोन पूत्र असे सहा पूत्र होते. लाईबाई नावाची एक कन्या असल्याचा उल्लेख सापडतो. श्री क्षेत्र आळंदी येथे कान्होजी आंग्रे यांची पत्नी लक्ष्मीबाई यांनी दीपमाळ बांधल्याचा शिलालेखात उल्लेख सापडतो.

कान्होजी म्हणजे मराठी राज्यांतील प्रसिद्ध मुत्सद्दी आणि धडाडीचे दर्यावर्दी सरदार कान्होजी आंग्रे होय. संभाजी महाराज, राजाराम महाराज यांच्या बिकट कारकीर्दीत कान्होजी आंग्रे यांच्या पराक्रमाने मोघलांना नकोसे होऊन गेले होते. राजाराम महाराज यांच्याकडून सुवर्णदुर्गावर नेमणूक झाल्यावर त्यांनी मराठेशाहीच्या पडत्या काळात पश्चिम किनाऱ्याचे संरक्षण उत्तमरितीने केले होते.

त्यामुळेच त्यांना ध्वजाधिकारी “सरखेल” इत्यादी किताब मिळाले होते. सरखेल म्हणजे आरमाराचा प्रमुख. मराठ्यांच्या आरमाराचे ते मुख्य अधिपती झाले. त्यामुळे इंग्रज, फिरंगी आणि यवनांचे कान्होजी आंग्रे यांच्यापुढे काही चालत नव्हते. कान्होजी यांनी धर्मस्थापना केली. मुंबईच्या ब्रिटीश गव्हर्नरास कान्होजी आंग्रे यांनी ठणकावून सांगितले होते की, आमचे राज्य जुलूम, बलात्कार, चाचेगिरी याच्यावर चालले आहे, असे म्हणणे तुमच्यासारख्या व्यापाऱ्यांना शोभत नाही. श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी चार बादशहाबरोबर लढाया केल्या. स्व-पराक्रमाने राज्य स्थापन केले. यानुसार आमच्या सत्तेला आरंभ झाला आहे. त्यानुसार आमचे राज्य टिकले आहे. याचा विचार तुम्हीच केला पाहिजे, असे ते ठणकावून इंग्रजांना म्हणाले होते.

आपण अलिबाग येथे पर्यटनाच्या दृष्टीने जिल्ह्यातील एकूण १५ तालुक्यांना जरुर भेटी द्या. प्रत्येक तालुक्यात ऐतिहासिक वास्तू आहे.

1. महाड- छत्रपतींचा रायगड किल्ला, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी समतेसाठी दिलेला लढा, चवदार तळे
2. पोलादपूर- कविंद्र परमानंद यांची समाधी
3. श्रीवर्धन- बाळाजी विश्वनाथ पेशवे यांचे जन्मस्थान आणि श्रीहरिहरेश्वर
4. पनवेल- वासुदेव बळवंत फडके यांचे जन्मस्थान- शिरढोण.
5. उरण- घारापुरी लेणी
6. म्हसळा- काजूंचे आगर
7. तळा- किल्लाज
8. रोहा- सीडी देशमुख आणि पांडुरंग शास्त्री आठवले
9. कर्जत- माथेरानची छोटी रेल व थंड हवेचे ठिकाण
10. पेण- श्री गणपतीच्या मुर्तीसाठी प्रसिद्ध शहर
11. खालापूर- खोपोली विद्युत केंद्र
12. माणगाव- मुंबई-गोवा महामार्गावरील शहर संभाजी पुत्र शाहू यांचे जन्मस्थान गांगवली
13. मुरुड-जं‍जिरा समुद्रातील भव्य दिव्य किल्ला जंजिरा
14. अलिबाग येथील नागाव बीच, समुद्रातील कुलाबा किल्ला.

आवास आणि सर्वात महत्वाचे म्हणजे सरखेल कान्होजी आंग्रे यांची कर्मभूमी असलेली येथील त्यांची समाधी. आपण अलिबागला बसने येताना दैनिक कृषीवलच्या कार्यालयासमोर उभा असलेला दिमाखदार सरखेल कान्होजी आंग्रे यांचा पुतळा दिसतो. त्यानंतर आपण शहरात आल्यावर सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या भव्य दिव्य एकूण 10 समाधींचे दर्शन होते. हा परिसर उत्तम होण्यासाठी शासनाने भरपूर मदत केलेली आहे, येथेही सरखेल कान्होजी आंग्रे यांचा पुतळा उभारण्यात आला आहे. अलिबागच्या जनतेने आणि महाराष्ट्र शासनाच्या प्रयत्नाने तसेच राज्याच्या माजी मंत्री श्रीमती मीनाक्षीताई पाटील व सर्वांच्या सहकार्याने येथील परिसर हा अतिशय रमणीय आणि उत्साही झाला आहे. येथे एक विहिरही आहे. संपूर्ण प्राचीन वास्तुंचे नुतनीकरण करण्यात आले आहे. ज्या योध्याने बलदंड शरीर, मनाने आणि प्रयत्नाने इंग्रज, फ्रेंच, डच, पोर्तुगीजांना ठणकावून सांगितले होते, ही भूमी आमची आहे. खबरदार आमच्या सागरावर बिना परवानगीने आलात तर !

अशा कान्होजी आंग्रे ह्या स्वामीनिष्ठ सरदाराची आज २८६ वी पुण्यतिथी. दिनांक ४ जुलै १७२९ रोजी त्यांचे निधन झाले. त्यानिमित्त या शूरवीराच्या धडाडीचा, कार्याचा छोटीशी ओळख. त्यांच्या कर्तुत्वाची गाथा अशीच पुढे चालू राहील. सागर सांभाळणाऱ्या नेत्यास यानिमित्त आपला सर्वांचा मानाचा मुजरा.

-प्रा. श्रीपाद माधव नांदेडकर, धुळे
संपर्क 9833421127, 9404577020