Tuesday, 1 November 2016

चंदेरी किल्ला

देरी किल्ला हा २३०० फुट उंचीचा गिरीदुर्ग प्रकारातील किल्ला आहे. ठाणे जिल्ह्यातील माथेरान डोंगर रांगेतील हा किल्ला ट्रेकर्सच्या दृष्टीने कठीण समजला जातो. भरपूर प्रमाणत लोक या ठिकाणी भेट देण्यासाठी व किल्ला पाहण्यासाठी येत असतात.

मुंबई-पुणे लोहमार्गावरून कल्याणहून कर्जतकडे जाताना एक डोंगररांग आहे. त्यातून आपला भला थोरला माथा उंचावलेला एक प्रचंड सुळका दिसतो. त्याचे नाव चंदेरी. बदलापूर-वांगणी स्थानकादरम्यान बदलापूर-कर्जत रस्त्यावर गोरेगाव नावाचे गाव आहे. येथूनच चंदेरीची वाट आहे.

नाखिंड, चंदेरी, म्हसमाळ नवरी बोयी या डोंगररांगेतील एक व पनवेलच्या प्रभागमंडळाचे मानकरी असणाऱ्या कर्नाळा, प्रबळगड, इरशाळगड, माणिकगड, पेब, माथेरान आणि अशा कितीतरी गडांपैकी एक म्हणजे चंदेरी होय. चंदेरीच्या पायथ्याशी असलेली घनदाट वृक्षराजी, गवताळ घसरडी वाट अन मुरमाड निसरडा कातळमाथा म्हणजे सह्याद्रीतील एक बेजोड असा हा कठीण परिसर आहे. तामसाई गावाच्या हद्दीत असणारा असा हा दुर्ग प्रस्तरारोहण कलेची आवड असणाऱ्या गिर्यारोहकांचे खास आकर्षण आहे.

इतिहास : खरे तर रायगड जिल्ह्याचे दुर्गभूषण शोभणारा हा किल्ला असूनही तसे नाव घेण्याजोगे इथे काही घडले नाही. किल्ल्यावरील गुहेच्या अलिकडे एक पडक्या अवस्थेतील शेष तटबंदी दिसते. किल्लेपणाची हीच काय ती खूण. मे १६५६ मध्ये शिवरायांनी कल्याण भिवंडी-रायरी पर्यंतचा सारा मुलुख घेतला. तेव्हा त्यात हा गडही मराठ्यांच्या ताब्यात आला अल्प विस्तार, पाण्याची कमी साठवणूक, बांधकामाचा अभाव मर्यादित लोकांची मुक्कामाची सोय. अतिशय अवघड वाट हे सारे पाहून हा किल्ला नसून एक लष्करी चौकी असेच वाटते. काही जणांच्या मते ७ ऑक्टोबर १९५७ रोजी चंदेरी किल्ल्याच्या सुळक्यावर संघटित प्रस्तरारोहणाचा प्रारंभ झाला.

गडावरील पाहण्यासारखी ठिकाणे 

गुहेत पूर्वी एक शिवलिंग व नंदी होता. शिवपिंड भंगलेल्या अवस्थेत आहे. तर नंदीचे अपहरण झाले आहे. गुहेच्या अलीकडेच एक सुमधुर पाण्याचे टाके आहे ऑक्टोबर शेवटपर्यंतच त्यात पाणी असते. ८ ते १० जणांच्या मुक्कामासाठी गुहा उत्तम आहे.

गुहेच्या थोडे पुढे सुळक्याच्या पायथ्याशी देखील एक टाके आहे. कातळमाथ्याचा विस्तार फक्त लांबी पुरताच आहे. सुळक्यावरून उगवतीला माथेरान, पेब, रबळची डोंगररांग इ. दिसते. तर मावळतीला भीमाशंकरचे पठार, सिद्धगड, गोरक्षगड, पेठचा किल्ला इ. दिसतात. गडाच्या पायथ्याचा परीसर पावसाळ्यात फारच रमणीय व विलोभनीय असतो. धबधब्याचा आस्वाद घ्यायला अनेक पर्यटक येथे येतात.

गडावर जाण्याच्या वाटा : मुंबई-कर्जत लोहमार्गवरील ‘वांगणी’ या रेल्वे स्थानकावर उतरावे. तेथून लोहमार्गाच्या कडेकडेने (बदलापूरच्या दिशेस) जाणाऱ्या वाटेने गोरेगाव गाठावे. मुख्य रस्त्यावरून डावीकडे जाणारी वाट (कच्ची सडक) चिंचोली या पयथ्याच्या गावी घेऊन जाते. बदलापूर स्थानकात उतरून चिंचोलीस साधारण पाऊण तासाची पायपीट करूनही पोहचता येते. (वांगणी स्थानकातून गोरेगाव पर्यंत जाण्यास भाड्याची वाहनेही मिळतात.) चिंचोली गावास उजवीकडे ठेऊन वर जाणाऱ्या दोन वाटा आहेत. एका लहानशा टेकाडाच्या दोन बाजूंनी ह्या वाटा जातात.

गुहेत ६ ते १० जणांची राहण्याची सोय आहे. पाण्याची सोय ऑक्टोबर शेवटपर्यंत पावसावर अवलंबून असते. तसेच टाक्यांत पाणी असते. चिंचोली गावातून किल्ल्यावर जाण्यासाठी दीड तासांचा वेळ लागतो.

- भूषण दुनबळे,
(८३०८२६८७२६)
bhushandunbale111@gmail.com

चाकणचा किल्ला

पुणे-नाशिक मार्गावर असलेला चाकणचा भुईकोट किल्ला ऊर्फ संग्रामगड हा फिरंगोजी नरसाळा या किल्लेदाराने बलाढ्य मोगली सेनेसमोर सलग ५५ दिवस लढवल्यामुळे शिवचरीत्रात प्रसिद्ध आहे. प्राचीनकाळी चाकण हे घाटमाथ्यावरील व्यापारी केंद्र होते. त्याच्या रक्षणासाठी चाकणचा भुइकोट बांधण्यात आला. या किल्ल्यावरुन घोटण, पौड या मावळांवर आणि घोडनेर, भीमनेर या नेरांवर नजर ठेवता येत असे. 

इतिहास :

चाकणचा भुईकोट किल्ला हा प्राचीन किल्ला आहे. अनेक ऐतिहासिक प्रसंगांना साक्षी असलेल्या या किल्ल्यांचा ताबा देवगिरीच्या यादवांचा पाडाव झाल्यावर अल्लाउद्दीन खिलजीकडे गेला. त्यानंतर अल्लाउद्दीनशहा बहामनीने घाटमाथा व कोकणपट्टीवर कब्जा करण्याचे निश्चित केले. ही कामगिरी मलिक उत्तुजारवर सोपवण्यात आली. त्याने चाकण येथे आपले प्रमुख ठाणे केले (१४५३). या मोहिमेत विशालगडावर स्वारी करण्यासाठी निघालेल्या मलिक उत्तुजारच्या सेनेला शिर्के व मोरे यांनी फसवून त्यांच्यावर या मोक्याच्या जागी अचानक हल्ला करुन मलिक उत्तुजार सह २५०० जणांची कत्तल केली.

शिवाजी राजांचे पणजोबांचे (बाबाजी), वडील मालोजी व खेळोजी यांना दौलताबादचा सुभेदार अमिरशा याने चाकण चौऱ्यांशी परगण्याची जहागिरी दिली होती. पुढे चाकण प्रांत शहाजीराजांच्या जहांगिरीत होता. शिवाजी महाराजांनी हा किल्ला आदिलशहाकडून जिंकून घेतला, त्यावेळी फिरंगोजी नरसाळा किल्लेदार होता. त्याने राजांशी निष्ठा व्यक्त केली व राजांनी त्याचीच किल्लेदार म्हणून नेमणून केली.

२१ जून १६६० रोजी शाहिस्तेखानाच्या २० हजार फौजेने चाकणच्या भुइकोटला वेढा घातला. त्यावेळी किल्ल्यात ६०० ते ७०० मराठे होते, धनधान्य व दारुसाठा पुष्कळ होता. मराठ्यांनी तोफा, बंदुकी व रात्रीचे मोगल सैन्यावर छापे घालून किल्ला भांडता ठेवला. दिवसामागून दिवस उलटले तरी किल्ला पडत नाही हे पाहून शाहिस्तेखानाने ईशान्येकडील बुरुजापर्यंत भुयार खोदले. वेढ्याचा ५५ वा दिवस १४ ऑगस्ट १६६०, या दिवशी भुयारात दारु भरुन बत्ती देण्यात आली. १५ ऑगस्ट १६६० रोजी मोगलांनी निकराचा हल्ला केला. मराठे बालेकिल्ल्याच्या आश्रयाने लढले, पण मराठ्यांचे बळ व सामग्री संपत आली होती. त्यामुळे त्यांनी किल्ला मोगलांच्या ताब्यात दिला.

पाहण्‍याची ठिकाणे : 

चाकणचा किल्ला भुईकोट प्रकारात येत असून कालौघात किल्ल्याची पडझड झाली असून फारसे अवशेष बघायला मिळत नाहीत. चाकणचा किल्ला पूर्व पश्चिम असा असून पूर्वेकडून आपण किल्ल्यात प्रवेश करतो. प्रवेश करतांना खंदक आणि तटबंदी पाहायला मिळते त्यावरून किल्ल्याची सुरक्षा चोख असावी असे कळते. किल्ल्याची तटबंदी उंच असून दगड आणि विटांचे बांधकाम आढळून येतं. प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला देवडी आहे. प्रवेशद्वार पाहून सरळ किल्ल्यात गेल्यास श्री दामोदर विष्णू मंदिर बांधलेले दिसते आणि मंदिराच्या दोन्ही बाजूला तोफा ठेवलेल्या असून बाजूला कातळात कोरलेली ३ शिल्पे पाहायला मिळतात आणि मंदिराच्या विरुद्ध दिशेला एक तोफ ठेवलेली दिसते त्याच्याच बाजूला मशिद आहे. मंदिर आणि मशिद अलिकडच्या काळातील बांधणीचे असावे. तिथूनच किल्ल्याच्या बुरुजावर जाण्यासाठी पायऱ्या आहेत. किल्ल्याच्या तटबंदीवरून किल्ल्याचा संपूर्ण परिसर न्ह्याहाळता येतो. किल्ल्याची दुरुस्ती सिमेंट वापरून करण्याचा प्रयत्न केला असावा असा तटबंदीवरील कामावरून अंदाज लावता येतो. तटबंदीवर बंदुका डागण्यासाठी आजूबाजूला सलग ५ ते ६ खोबण्या केलेल्या दिसतात. तटबंदीवरून ३ बुरुज स्पष्टपणे पाहता येतात. अतिक्रमणामुळे आणि अनधिकृत बांधकामामुळे किल्ल्यातून जाण्या येण्याचा सिमेंटचा रस्ता बांधण्यात आला आहे.

पोहोचण्याच्या वाटा : 

मुंबई - तळेगाव - चाकण या मार्गाने चाकणला जाता येते. चाकण बस स्थानकापासून उजव्या हाताला गेल्यास मराठी प्रशाले समोरून प्रवेशद्वारातून प्रवेश केल्यास किल्ल्याच्या मागच्या बाजूने आपला प्रवेश होतो. इंदुरीचा किल्ल्यापासून चाकणचा किल्ला १५ किलोमीटर अंतरावर आहे.

- भूषण दुनबळे(८३०८२६८७२६)
bhushandunbale111@gmail.com

कन्हेर गड

कन्हेरगड किल्ल्याची उंची 660 मीटर असून तो गिरीदुर्ग प्रकारातील किल्ला आहे. सह्याद्री पर्वताच्या रांगेत असलेला हा किल्ला चढाईसाठी मध्यम स्वरुपाचा आहे. त्यामुळे तरुणांबरोबर मुले, महिलाही येथे सहज जाऊ शकतात. जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव रेल्वे स्टेशनपासून 18 किलोमीटर अंतरावर कन्हेरगड हा किल्ला आहे.

या इतिहासदुर्गाची उभारणी आठव्या शतकात झाली. येथे यादव सम्राट आणि त्यांच्या मांडलिकांचे राज्य होते. शके 1150 मधील आषाढी अमावास्या व सूर्यग्रहण असलेल्या दिवशी पाटणादेवीचे मंदिर जनतेसाठी खुले केल्याचा उल्लेख संत जनार्दन चरित्रात आहे. या मंदिराच्या परिसरात खगोलशास्त्रज्ञ व गणितसूर्य भास्कराचार्यानी शून्याची संकल्पना मांडली आहे. त्याच्या वास्तावासंबधीचा शिलालेख येथे आढळून येतो. हा परिसर अतिशय नयनरम्य व मनमोहक निसर्गसौंदर्याने बहरलेला आहे.

चाळीसगाव हे तालुक्याचे ठिकाण असून पाटणादेवी येथे येण्यासाठी मध्य रेल्वेने सहजपणे पोहचू शकतात. चाळीसगाव बसस्थानकावरुन दर तासाला पाटणादेवी या पर्यटनस्थळी जाण्यासाठी एसटी उपलब्ध आहे. सकाळी साडेसहा वाजेपासून बससेवा आहे. बसने पाटणादेवी स्थानकाच्या दिड किलोमीटर अलिकडे महादेव मंदिर थांब्यावर कन्हेर गडासाठी उतरावे लागते. डाव्या हाताच्या खडकाळ पायवाटेने दहा मिनिटात मंदिरात जाता येते. मंदिराच्या मागून पंधरा मिनिटे चालल्यावर एक सिंमेटमध्ये बांधलेली मेघडंबरी येते. तेथून डाव्या हाताने जाणाऱ्‍या पायवाटेने कन्हेरगडचा डोंगर चढायला सुरुवात करावी. कन्हेर गडावर जाण्यासाठी असलेला प्रवेशद्वार आजही सुस्थितीत आहे. वाटेत दगडी पायऱ्‍या ही लागतात. पुढे दहा मिनिटात पायवाट उजवीकडे वळते आणि नागार्जुन गुंफापाशी पोचतो. उजवीकडे वळणाऱ्‍या वाटेवर शृंगारचौरी लेणी आणि डावीकडे वळणाऱ्‍या वाटेवरचा दगडी कातळ चढली की कन्हेरगडाची माची लागते. तिथून पुढे जात राहिले की गडाच्या माथ्यावर पोहोचता येते.

पाहण्यासारखी ठिकाणे :

हेमांडपती महादेव मंदिर 

उंच चौथऱ्‍यावर काळ्या दगडांनी बांधलेल्या ह्या पूर्वेकडे तोंड असलेल्या सुंदर मंदिराच्या चारी बाजूने अनेक मूर्ती कोरल्या आहेत. मंदिराच्या गर्भगृहाच्या दरवाज्यावर गणेशपट्टी आणि सप्तमातृका आहेत. मंदिराचा सभामंडप आणि तेथील एक शिलालेख पाहाण्यासारखा आहे. हे मंदिर भारतीय पुरातन खात्याने संरक्षित म्हणून जाहीर केले आहे.

मेघडंबरी नागार्जुन गुंफा

या गुंफा इसवी सनाच्या नवव्या शतकात कोरलेल्या आहेत. येथे तीन दालने नक्षीकाम केलेले खांब, इंद्राची प्रतिमा, महावीराची एक व अन्य तीर्थकरांच्या मूर्ती आणि त्याच्यावर चवरी ढाळणाऱ्‍या सेवकाची एक मूर्ती आहे.

सीतेची न्हाणी लेणी

लेण्यांची ओवरी 18 फुट रुंदीची असून दोन्ही बाजूला साधे खांब आहेत. येथे प्रभू रामचंद्र येऊन गेले होते अशी आख्यायिका ऐकायला मिळते.

शृगांरचौरी लेणी

ही अकराव्या शतकातली हिंदू पद्धतीची लेणी आहेत. लेणी पाच खांब्यावर उभी असून आत काही शृंगारिक चित्रे कोरलेली आहेत.

पाटणादेवी मंदिराच्या परिसरात राहण्यासाठी वनखात्याच्या वतीने भक्त निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे. चहा, नास्त्यासाठी स्थानिकांची दुकाने आहेत. सर्व लेणी, पुरातन मंदिरे आणि आसपासची सर्व ठिकाणे पाहण्यासाठी पाटणादेवीला दोन दिवसांचा मुक्काम करावा लागतो.

- निलेश परदेशी
चाळीसगाव, जि.जळगाव

किल्ले सेगवा

महाराष्ट्र गुजरातच्या सीमेजवळ सेगवा आणि बल्लाळगड हे दोन किल्ले आहेत. पालघर जिल्ह्यात आणि तलासरी तालुक्यात, मुंबई - अहमदाबाद महामार्गाच्या जवळ असूनही हे किल्ले तसे दुर्लक्षित आहेत. ११ व्या शतकात बांधल्या गेलेल्या आणि शिवकाळात पुनर्बांधणी झालेल्या सेगवा किल्ल्यावर अनेक अवशेष काळाची झुंज देत आजही उभे आहेत. या भागात असणाऱ्या इतर किल्ल्यांच्या मानाने (असावा, अशेरीगड इत्यादी) सेगवागडाची उंची पायथ्याच्या करंजविरा गावापासून कमी असल्याने २ ते ३ तासात सहज पाहून होतो. सेगवा आणि बल्लाळगड हे दोनही किल्ले एका दिवसात पाहून होतात. ऐतिहासिक कागदपत्रात सेगवा गडाचा उल्लेख सेगवाह या नावानेही येतो. 

केळवे माहिमचे मूळ नाव मत्स्यमत्‌, त्याचे पुढे झाले महकावती व नंतरच्या काळात माहिम. प्राचिनकाळी प्रतापबिंब राजाने दमणपासून वाळुकेश्वरापर्यंतच्या (आजची मुंबई) समुद्र किनाऱ्यावर आपले राज्य स्थापन करुन त्याची राजधानी म्हणून महिकावतीची निवड केली. त्याच काळात सेगवा किंवा सेगवाह किल्ला बांधण्यात आला. १४ व्या शतकात गुजरातच्या सुलतानाने हा परीसर ताब्यात घेतला तेव्हा हा गडही त्याचा ताब्यात गेला. पुढील काळात या भागावर रामनगरच्या कोळी राजांचे अधिपत्य होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी इ.स. १६७२ ते १६७७ या काळात मोरोपंताना ६००० ची फौज देऊन उत्तर कोकणात पाठवले. इ.स. १६७७ ला रामनगरच्या कोळी राजाच्या ताब्यात असलेला प्रांत महाराजांच्या अधिपत्याखाली आला. त्याच काळात सेगवा किल्ला स्वराज्यात दाखल झाला.

इ.स. १६८३ पासून पुढील ६६ वर्षे हा किल्ला पोर्तुगीज आणि रामनगर यांच्याकडे होता. चिमाजी आप्पानी काढलेल्या वसई मोहिमेत इ.स. १७३९ मध्ये कृष्णाजी महादेव चासकर यानी सेगवागड जिंकुन घेतला. पुन्हा इ.स. १७५४ मध्ये हा किल्ला रामनगरच्या कोळी राजाकडे गेला. इ.स. १८०२ मध्ये झालेल्या तहात सेगवा किल्ला पेशव्यांकडे आला. इ.स. १८१७ मधे गोगार्डच्या अधिपत्या खालील सैन्याने सेगवागड जिंकला.

पाहण्याची ठिकाणे : करंजविरा गावातून आपण पाऊण तासात गडाच्या माचीवर वायव्य दिशेकडून प्रवेश करतो. माची दक्षिणोत्तर पसरलेली आहे. येथुन उजवीकडे (दक्षिणेकडे) गेल्यास माचीचे टोक आहे. तर डावीकडे (उत्तरेकडे) बालेकिल्ला आहे. प्रथम माचीच्या टोकाकडे जावे. तेथुन खालचे करंजविरा गाव, मुंबई - अहमदाबाद हायवे आणि महालक्ष्मीचा सुळका पाहाता येतो. माचीच्या टोकावरुन परत किल्ल्यावर प्रवेश केला त्या ठिकाणी येऊन बालेकिल्ल्याकडे चालायला सुरुवात केल्यावर डाव्या बाजुला हनुमानाचे नविन मंदिर व त्यातील हनुमानाची संगमरवरी मूर्ती पाहाता येते. कारण हा किल्ला शिवाजी महाराजानी जिंकुन त्याची पुनर्बांधणी केली होती. हनुमान मंदिरावरुन पुढे जाताना माचीच्या दोनही बाजुस उतारावर तटबंदीचे अवशेष पाहायला मिळतात. त्यात चुना भरला जाई. यामुळे दगड एकमेकात अडकून राहात, तसेच बाहेरच्या बाजूंनी तटबंदी दिसतांना अखंड दगडाची दिसे. तीव्र उतारावर बांधलेल्या तटबंदीचे आज मोजकेच अवशेष गडावर पाहायला मिळतात.

गडाच्या माचीवर महादेवाचे मंदिर आहे. स्वच्छ सारवलेल्या आणि पत्र्याने शाकारलेल्या या मंदिरात पिंड, नंदी, कासव आणि गणेशाची मूर्ती आहे. येथे पुजेचे पाणी भरुन ठेवण्यासाठी दगडात कोरलेली एक ढोणी पाहायला मिळते. माची आणि बालेकिल्ल्याच्या डोंगरामध्ये एक घळ आहे. या घळीत उतरून बालेकिल्ल्यावर चढताना बालेकिल्ल्याच्या तटबंदीचे अवशेष पाहायला मिळतात. बालेकिल्ल्याच्या प्रवेशद्वारा समोर असलेल्या पायऱ्या चढुन पश्चिमाभिमुखी उद्ध्वस्त प्रवेशद्वारातून आपला बालेकिल्ल्यावर प्रवेश होतो. येथुन दोन वाटा फुटतात. सरळ वर चढत जाणारी वाट किल्ल्याच्या सर्वोच्च माथ्याकडे जाते. दुसरी उजव्या बाजूने जाणारी वाट पाण्यांच्या टाक्यांकडे जाते. आपण उजव्या बाजूच्या वाटेने चालायला सुरुवात केल्यावर उजव्या बाजूला दरीच्या बाजूला तटबंदीचे काही अवशेष पाहायला मिळतात. पुढे एक घळ लागते. या जागी पूर्वी किल्ल्याचा दक्षिणाभिमुख दरवाजा होता आता तो पूर्णपणे कोसळलाय. त्याचे दरीत पसरलेले दगड येथे पाहायला मिळतात.

पोहोचण्याच्या वाटा : करंजविरा हे सेगवागडाच्या पायथ्याचे गाव आहे. तेथे जाण्यासाठी मुंबई - अहमदाबाद महामार्गावरील १११ किमी वरील चारोटी नाका गाठावा. त्यापुढे अंदाजे ४ किमीवर महालक्ष्मीचे प्रसिद्ध मंदिर आहे. महालक्ष्मीच्या पुढे ११ किमीवर (मुंबई पासून १२५ किमीवर) आंबिवली गाव आहे. उजवीकडे जाणारा रस्ता करंजविरा गावात जातो. गावातील शाळेपर्यंत खाजगी वाहनाने जाता येते. रेल्वेने डहाणू आणि तलासरी येथे उतरून स्टेशन बाहेर मिळणाऱ्या खाजगी जीप/ओमनी या वाहनांनी आंबिवली किंवा करंजविरा फाट्यावर उतरावे. तेथुन चालत अर्ध्या तासात आपण गावातील शाळेजवळ पोहोचतो.

करंजविरा गावाच्या मागे सेगवागड आहे. गावातून पुढे जाणारा रस्ता संपला की शेतातून जाणारी पायवाट आपल्याला गडाच्या डोंगराच्या डाव्या बाजूच्या धारेखाली आणून सोडते. तेथुन मळलेल्या पायवाटेन पाऊण तासात खडा चढ चढून आपण माचीवर पोहोचतो.

- भूषण दुनबळे,
८३०८२६८७२६
bhushandunbale111@gmail.com

Monday, 8 August 2016

श्रीमंत_सरदार_गोदाजीराजे_जगताप‬

8 ऑगस्ट गोदाजी राजे जगताप शौर्य दिन.
8 ऑगस्ट 1648 या दिवशी खळद-बेलसर या ठिकाणी स्वराज्याची पहिली लढाई झाली या लढाईत मराठ्यांनी अविस्मरणीय विजय मिळविला.
‪#‎श्रीमंत_सरदार_गोदाजीराजे_जगताप‬

Friday, 29 July 2016

आपला हक्काचा नारा...... जाणुन घेऊ सात/बारा........

                            आपला हक्काचा नारा...... जाणुन घेऊ सात/बारा........

     प्रचार प्रसार प्रसिद्धी व माहिती संस्थान महा. राज्य संचालित वतन बचाओ आंदोलनच्या वतीने ७/१२ परीषद घेण्यासाठी सातबारा यात्रेचे लवकरच आयोजन करण्यात येणार आहे. आम्ही आपल्या प्रत्यक्ष भेटीसाठी येणार आहोत. आपल्या समस्यां आपले प्रश्न जाणून घेणार आहोत.आणि ते सोडविण्यासाठी आम्ही सामाजिक पटलावर ते मांडणार आहोत. सदरच्या उपक्रमात आपला सहभाग दर्शवावा.
                                                                                                      धन्यवाद
                                                                                              वतन बचाओ आंदोलन


Sunday, 15 May 2016

स्वराज्याचे हिरे व किल्ले

छत्रपती शिवाजी महाराज यांचे शिवचरित्र  १२ मावळे घेतल्याशिवाय तसेच वेल्हे येथिल प्रचंडगड म्हणजे आजचा तोरणागड तसेच रायरेश्वर येथिल शपथ घेतल्याशिवाय पुर्ण होऊ शकत  नाही. प्रथम नेताजी पालकर,वीर बाजी पासलकर , झुजांरराव मरळ,येसाजी कंक,कानोजी जेधे,येसाजी कामठे ……… क्रमश:






"संभाजी राजे यांची चित्रमय संघर्ष गाथा " शूर-पराक्रमी-विचारवंत-शिलवंत-न्यायी-लेखक-साहित्यिक अशा संभाजी राजे यांची हत्या

"संभाजी राजे यांची चित्रमय संघर्ष गाथा " शूर-पराक्रमी-विचारवंत-शिलवंत-न्यायी-लेखक-साहित्यिक अशा संभाजी राजे यांची हत्या …… 

 संभाजी राजे यांचा  इतिहास प्रत्येक मानवधर्माला न्याय देणारा  इतिहास आहे.शूर-पराक्रमी-विचारवंत-शिलवंत-न्यायी-लेखक-साहित्यिक असे राजे होते.  शहाजी राजे यांचा नातू माता जिजाऊ यांचे लाडके छत्रपती शिवाजी महाराज यांचा शूर पुत्र असे त्यांचे कर्तृत्व होते. भट बामनांचा कर्दनकाळ होते संभाजी राजे सर्वात प्रथम शाक्त धर्माची दीक्षा त्यांनी घेतली होती. जिजाऊ प्रकाशन लेखक चंद्रशेखर शिखरे लिखीत "संभाजी राजे यांची चित्रमय संघर्ष गाथा "
 क्रमश:
राजेश खडके

"संभाजी राजे यांची संघर्ष गाथा " कुळवाडी भुषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवरायांची हत्या..........


"संभाजी राजे यांची संघर्ष गाथा " कुळवाडी भुषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवरायांची हत्या....भाग १ }

जिजाऊ प्रकाशन यांनी प्रकाशित केलेले लेखक चंद्रशेखर शिखरे यांचे "संभाजी राजे यांची संघर्ष गाथा " हे चित्रमय पुस्तक वाचले. हे पुस्तक वाचत असताना मध्ययुगीन भारताच्या इतिहासाची अनमोल अशी माहिती मला मिळाली. मानवा प्रती संताची भूमिका भावना याचे दर्शन झाले. त्यामधिल चित्राच्या माध्यमातून एक बोलक्या प्रतिक्रिया अनुभवयाला मिळत होत्या.भारतातील जैन- बौध्द धर्माची माहिती मिळाली. भारत हा स्त्री प्रधान देश होता याची माहिती मिळाली. परंतु भट बामनांचा इतिहास वाचत असताना मन हेलाऊन गेले हे भट बामन इतके क्रुर होते याचे दर्शन या लेखकाने केले आहे. अंगावर तर शहारे आलेच पण या भट बामनांचा रागही तेवढा आला आहे. कारण या पुस्तकात असे लिहिले आहे की,रायगडावर छत्रपती शिवरायांची हत्या याच भट बामनांनी केली आहे. कुळवाडी भुषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवरायांचे अंत्य दर्शन या बहुजन समाजाला होऊ दिले नाही आपल्या पोटचा मुलगा युवराज संभाजी राजे भोसले यांना होऊ दिले नाही. त्यांचा अत्यंविधी न करता त्यांना भडाग्नी देऊन त्यांचा देह मातीत याच भट बामनांनी विलीन केला आहे. अशा इतिहासाची माहिती "संभाजी राजे यांची संघर्ष गाथा " या पुस्तकाने दिली आहे. क्रमश:


भाग २ } 

छत्रपती शिवाजी महाराजांचा अत्यंसंस्कार भट बामानानी होऊ दिला नाही याचे कारण काय ? असाही प्रश्न मला हे पुस्तक वाचताना पडला त्याचे उत्तर मला या "संभाजी राजे यांची संघर्ष गाथा " ह्या पुस्तकामध्ये आढळुन आला नाही. नेमके छत्रपती शिवाजी महाराजांचा अत्यंसंस्कार जर झाला असता तर तो कोणत्या संस्कारा प्रमाणे किंवा धर्माप्रमाणे झाला असता याचे उत्तर या पुस्तकाचे लेखक चंद्रशेखर शिखरे यांनी द्यावे असे या प्रतिक्रियाव्दारे मी त्यांना निवेदन करीत आहे. कारण धर्मा शिवाय कोणता राजा नाही संस्कारा शिवाय कोणते कुटुंब नाही. मला या पुस्तका नुसार जे आकलन झाले आहे ते असे की त्याकाळी हिंदु नावाचा कोणाताही धर्म नव्हता त्याकाळी जैन बौध्द मुस्लिम आणि ख्रिश्चन तसेच शीख पंथ होता शाक्त नावाचा पंथ किंवा धर्म होता का नाही आणि याचे धर्म असे विश्लेषण करता येईल काय ? असाही प्रश्न याठिकाणी उपस्थित झाला आहे याचे उत्तर लेखक चंद्रशेखर शिखरे यांनी दिले पाहिजे. हे पुस्तक प्रकाशन करण्यासाठी त्यांनी दहा वर्षाची मेहनत घेतली आहे. तसेच भट बामनांचा त्याकाळी वैदिक धर्म होता असे म्हटले जाते हे जरी सत्य असले तरी एक सत्य मला उलगडले नाही त्या काळाची जनता कोणत्या धर्माचे आचरण करत होती हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. संशोधक आणि इतिहासकार याचे काय विश्लेषण करतात हे आजच्या तरुणांना माहित हवे. क्रमश: 

भाग ३ }

या पुस्तकात लेखक असे म्हणतो की छत्रपती शिवरायांनी पहिला राज्याभिषेक वैदिक पद्धतीत रायगड याठिकाणी ६ जून १६७४ मध्ये माता जिजाऊ यांच्या साक्षीने केला. मात्र हा राज्याभिषेक झाल्या नंतर लगेचच १२ दिवसांनी माता जिजाऊ यांचे निधन झाले त्यानंतर महाराज अस्ताव्यस्त झाले. काही लोकांनी त्यांना वैदिक पद्धतीचा राज्याभिषेक मानवीला नसल्याचे सांगितले. त्यामुळे महाराजांनी गुप्त पद्धतीत दुसरा राज्याभिषेक २० सप्टेंबर १६७४ रोजी शाक्त धर्मा प्रमाणे गोसावी यांच्या हस्ते तांत्रिक पध्दती मध्ये केला असे लेखकांने म्हटले आहे. परंतु असे कोठेही महापुरुषांनी किंवा इतिहासकारांनी किंवा संशोधक यांनी म्हटल्याचे मला कोठेही सापडलेले नाही. कारण माता जिजाऊनी महाराजांना अंधश्रध्देकडे वळविले नव्हते त्यामुळे महाराजांनी तांत्रिक पद्धतीत तो राज्यभिषेक केलेला नाही असे स्वराज्य प्रेमी शिवपाईक म्हणुन वाटते. सदरच्या पुस्तकामध्ये लेखक असे म्हणतो की शिवरायांनी शाक्त पद्धतीचा राज्यभिषेक गुप्तपणे केला होता. परंतु मला तसे वाटत नाही कारण छत्रपती शिवराय शूर धाडसी पराक्रमी जनतेचे राजे होते भीती नावाचा शब्दही त्यांच्या जवळ येत नव्हता मग नेमके या लेखकाला काय सांगायचे आहे असा प्रश्न माझ्या समोर उभा राहिलेला आहे. का सदरचा राज्याभिषेक धर्म लेखकाला वाचका पासुन लपवून ठेवायचा आहे. कारण शाक्त धर्माचे खरे विश्लेषण जो पर्यंत लेखक आपल्या समोर जो आणित तो पर्यंत सदरच्या प्रश्नाचे गुढ कायम राहील आणि आपल्या सर्वांचा संभ्रम कायम राहील. क्रमश:

भाग ४ } 


परंतु सदर पुस्तकाचे वाचन केल्यानंतर काही ठिकाणी शाक्त धर्माचे पुरावे मला सापडले ते मी याठिकाणी देत आहे. "संभाजी राजे यांची चित्रमय संघर्ष गाथा"जिजाऊ प्रकाशन लेखक चंद्रशेखर शिखरे यांनी जरी त्यांच्या या पुस्तकात शाक्त धर्माचे खरे विश्लेषण केले नसले तरी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले पुस्तक "शुद्र पूर्वी कोण होते" तसेच कृ.अ. केळुसकर गुरुजी यांनी लिहिलेले "शिवचरित्र" हे पुस्तक आणि कॉ. शरद पाटील यांनी लिहिलेल्या "शिवरायांचे खरे शत्रू महंमदी की ब्राम्हणी" या पुस्तकात शाक्त धर्माचे खालील प्रमाणे विश्लेषण केले आहे.
दिवशी छत्रपती शिवाजी महाराज अधिकृत रयतेचे राजा झाले. त्या दिवसाला महाराष्ट्रात एक आगळे-वेगळे महत्त्व आहे. ६ जून १६७४ रोजी किल्ले रायगड येथे शिवाजी महाराजांचा पहिला राज्याभिषेक संपन्न झाला. बाबासाहेब आंबेडकरांनी "शुद्र पूर्वी कोण होते" हा ग्रंथ ओबीसी-कुणबी-मराठा या वर्गासाठी लिहिलेला आहे. याच पुस्तकात बाबासाहेबांनी शिवाजी महाराजांविषयी अतिशय संशोधनात्मक स्वरुपात शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे सखोल संशोधन केलेलं आहे. ज्या दिवशी शिवरायांचा राज्याभिषेक झाला, तेव्हापासून शिवरायांनी नवीन शक सुरु केले. त्याला "राज्याभिषेक शक" म्हणून ओळखले जाते. पण हे शक फार काळ टिकू शकले नाही. जोपर्यत शिवशाहीचे राज्य होते तोपर्यंतच हे शक पाळले गेले. शिवशाहीचा अस्त होऊन जेव्हा ब्राम्हण-पेशव्यांच्या हातात सत्ता आली. तेव्हा पेशव्यांनी असा हुकुम जाहिर केला की…"शिवशक बंद करून मोगल बादशहाचे फसली शक सरू करावे"
६ जून १६७४ रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक "वैदिक" पद्धतीत संपन्न झाला. पण असे करतांना काशीच्या गागाभट्ट या वैदिक-ब्राम्हण पुरोहिताने राज्याभिषेकात "वेदोक्त मंत्रपठण" न करता "पुराणोक्त मंत्र" पठन करून शिवरायांना "क्षत्रिय" मानण्यास नकार दिला. व शिवरायांना "शुद्र" घोषित केले गेले. या सर्व अपमानास्पद वागणुकीनंतर शिवरायांनी या छळाचा बदला घेण्याचे ठरविले. त्यानुसार शिवबांनी २४ सप्टेंबर १६७४ रोजी रायगड येथे दुसरा राज्याभिषेक "अवैदिक-शाक्त" पद्धतीत साजरा केला. ६ जून १६७४ ते २४ सप्टेंबर १६७४ या काळात शिवाजी महाराज कधीच राजसिंहासनावर बसले नाहीत. त्यांनी सर्व वैदिक परंपरा नाकारल्या.
वैदिक-ब्राम्हणी धर्माच्या विषमतावादी तत्त्वज्ञाला विरोध करण्यासाठी शिवरायांनी शाक्त धर्माची दिक्षा घेतली. शिवाजी महाराजांच्या अगोदर संभाजी महाराजांनी शाक्त धर्माची दिक्षा घेतली होती. कारण संभाजी महाराजांचे सासरे पिलाजी शिर्के हे शाक्त-धर्माचे होते. पिलाजी शिर्के मुळचे शृंगारपुरचे निवासी होते. संभाजी महाराजांनी आवैदिक-शाक्त धर्माचा अभ्यास करण्यासाठी शिवरायांनी त्यांना शृंगारपुर येथे ठेवले होते. शृंगारपुर हे शाक्तांचे एक प्रभावी केंद्र होते. शाक्त तत्वज्ञानी "शिवयोगी" यांनी शृंगारपुरला शाक्त-धर्मपीठ स्थापन करून शाक्त धर्माच्या प्रचारास सुरुवात केली. संभाजी राजांचा विरोध करणारे प्रामुख्याने वैदिक-ब्राम्हण होते. त्यामुळे त्यांचा बिमोड करणे संभाजीराजांचे पहिले कर्तव्य होते.
शिवकालीन वज्रयान गुह्य समाज (गुप्त समाज) या बौद्ध तंत्र संप्रदायातून विकसित झालेल्या शाक्त-धर्माची शिवरायांनी दिक्षा घेतली. या धर्मानुसार शाक्त-दिक्षा घेतल्यावर अस्पृश्य स्त्रीशी शैव-विवाह शिवरायांनी केला होता. पहिले शिवचरित्रकार कृ.अ. केळुसकर गुरुजींनी पृ. ४१०-११ च्या तळटिपेत या विषयी लिहिले आहे.
संदर्भ :- शुद्र पूर्वी कोण होते -> डॉ. बाबासाहेब आंबेडकर
शिवरायांचे खरे शत्रू महंमदी की ब्राम्हणी :-> कॉ. शरद पाटील
शिवचरित्र :-> कृ.अ. केळुसकर गुरुजी

भाग ५ }

छत्रपती शिवरायांनी वैदिक धर्म पध्दतीत केलेला रायगडा वरील राज्याभिषेक नाकारला होता आणि शाक्त पध्दतीमध्ये दुसरा राज्याभिषेक करून घेतला होता. याचाच राग भट बामनांना आला होता आणि त्यामुळेच नियोजित पध्दतीत त्यांनी  छत्रपती शिवरायांची हत्या केली.या पुस्तकाचे वाचन केले आणि त्यातील चित्र पाहिले तर हे लक्षात येते लेखकाने हे चित्रमय पुस्तक खूप हिमतीने लिहिले आहे. हे पुस्तक वाचल्यानंतर मन अत्यंत हेलावून जाते  या भट बामनांचे हे क्रुर कृत्य वाचून यातील चित्रमय गाथा वाचल्या नंतर मनाला खुप दु:ख होते. भट बामनांचा खूप खूप राग येतो. परंतु त्याहूनही जास्त असा राग येतो की,आजही ही भट बामन माता जिजाऊ, संभाजी राजे आणि  कुंभी नी स्त्रीची बदनामी बदनामी करणारे भट बामन यांना पुरस्कार दिला जातोय. क्रमश:
राजेश खडके 

Thursday, 21 April 2016

छत्रपती शिवाजी व संभाजी महाराजांनी केले शाक्त धर्मांतर :- एक संशोधन

ज्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज अधिकृत रयतेचे राजा झाले. त्या दिवसाला महाराष्ट्रात एक आगळे-वेगळे महत्त्व आहे. ६ जून १६७४ रोजी किल्ले  रायगड येथे शिवाजी महाराजांचा पहिला राज्याभिषेक संपन्न झाला. बाबासाहेब आंबेडकरांनी "शुद्र पूर्वी कोण होते" हा ग्रंथ ओबीसी-कुणबी-मराठा या वर्गासाठी लिहिलेला आहे. याच पुस्तकात बाबासाहेबांनी शिवाजी महाराजांविषयी अतिशय संशोधनात्मक स्वरुपात शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे सखोल संशोधन केलेलं आहे. ज्या दिवशी शिवरायांचा राज्याभिषेक झाला, तेव्हापासून शिवरायांनी नवीन शक सुरु केले. त्याला "राज्याभिषेक शक" म्हणून ओळखले जाते. पण हे शक फार काळ टिकू शकले नाही. जोपर्यत शिवशाहीचे राज्य होते तोपर्यंतच हे शक पाळले गेले. शिवशाहीचा अस्त होऊन जेव्हा ब्राम्हण-पेशव्यांच्या हातात सत्ता आली. तेव्हा पेशव्यांनी असा हुकुम जाहिर केला की…"शिवशक बंद करून मोगल बादशहाचे फसली शक सरू करावे"

६ जून १६७४ रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक "वैदिक" पद्धतीत संपन्न झाला. पण असे करतांना काशीच्या गागाभट्ट या वैदिक-ब्राम्हण पुरोहिताने राज्याभिषेकात "वेदोक्त मंत्रपठण" न करता "पुराणोक्त मंत्र" पठन करून शिवरायांना "क्षत्रिय" मानण्यास नकार दिला. व शिवरायांना "शुद्र" घोषित केले गेले. या सर्व अपमानास्पद वागणुकीनंतर शिवरायांनी या छळाचा बदला घेण्याचे ठरविले. त्यानुसार शिवबांनी २४ सप्टेंबर १६७४ रोजी रायगड येथे दुसरा राज्याभिषेक "अवैदिक-शाक्त" पद्धतीत साजरा केला. ६ जून १६७४ ते २४ सप्टेंबर १६७४ या काळात शिवाजी महाराज कधीच राजसिंहासनावर बसले नाहीत. त्यांनी सर्व वैदिक परंपरा नाकारल्या.

वैदिक-ब्राम्हणी धर्माच्या विषमतावादी तत्त्वज्ञाला विरोध करण्यासाठी शिवरायांनी शाक्त धर्माची दिक्षा घेतली. शिवाजी महाराजांच्या अगोदर संभाजी महाराजांनी शाक्त धर्माची दिक्षा घेतली होती. कारण संभाजी महाराजांचे सासरे पिलाजी शिर्के हे शाक्त-धर्माचे होते. पिलाजी शिर्के मुळचे शृंगारपुरचे निवासी होते. संभाजी महाराजांनी आवैदिक-शाक्त धर्माचा अभ्यास करण्यासाठी शिवरायांनी त्यांना शृंगारपुर येथे ठेवले होते. शृंगारपुर हे शाक्तांचे एक प्रभावी केंद्र होते. शाक्त तत्वज्ञानी "शिवयोगी" यांनी शृंगारपुरला शाक्त-धर्मपीठ स्थापन करून शाक्त धर्माच्या प्रचारास सुरुवात केली. संभाजी राजांचा विरोध करणारे प्रामुख्याने वैदिक-ब्राम्हण होते. त्यामुळे त्यांचा बिमोड करणे संभाजीराजांचे पहिले कर्तव्य होते.

शिवकालीन वज्रयान गुह्य समाज (गुप्त समाज) या बौद्ध तंत्र संप्रदायातून विकसित झालेल्या शाक्त-धर्माची शिवरायांनी दिक्षा घेतली. या धर्मानुसार 
शाक्त-दिक्षा घेतल्यावर अस्पृश्य स्त्रीशी शैव-विवाह शिवरायांनी केला होता. पहिले शिवचरित्रकार कृ.अ. केळुसकर गुरुजींनी पृ. ४१०-११ च्या तळटिपेत या विषयी लिहिले आहे.                                                                      

संदर्भ :-   शुद्र पूर्वी कोण होते ->  डॉ. बाबासाहेब आंबेडकर
               शिवरायांचे खरे शत्रू महंमदी की ब्राम्हणी :-> कॉ. शरद पाटील
               शिवचरित्र :-> कृ.अ. केळुसकर गुरुजी         

Friday, 1 April 2016

मराठी काव्य अनुवाद

जय जिजाऊ,
छत्रपती संभाजीराजे लिखित "बुधभूषण "या संस्कृत ग्रंथाचा मराठी काव्य अनुवाद इतिहासात पहिल्यांदाच मला करता आला याचा सार्थ अभिमान वाटतो, शिवमती. शैलजाताई ज्ञानेश्वर मोळक यांनी संपादक म्हणून अथक परिश्रमाद्वारे" बुधभूषण "ग्रंथ आपल्याला इतिहासात पहिल्यांदाच आणून अद्वितीय, महनीय शिवकार्य केले त्यास तोड नाही. ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. प्रभाकर ताकवले सरांनी "बुधभूषण "हा ग्रंथ संस्कृत मधून अतिशय प्रभावी पध्दतीने मराठीत अनुवाद केला, हया एैतिहासिक ग्रंथातील निवडक कौवणांचा मराठी काव्य अनुवाद करता आला ते केवळ सदर ग्रंथ संपादक शैलजाताई ज्ञानेश्वर मोळक व ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. प्रभाकर ताकवले सरांनी अनुवाद केल्यामुळेच मला "बुधभूषण " ग्रंथाचा मराठी काव्य अनुवाद करता आला हे विनम्र पणे कबूल करतो,शैलजाताई ज्ञानेश्वर मोळक व डॉ. प्रभाकर ताकवले सरांना लाख लाख घन्यवाद देतो",बुधभूषण "हा मराठी काव्य अनुवाद केलेला ग्रंथ लवकरच आपल्या भेटीस येत आहे.
बुधभूषण
शरद गोरे
मराठी काव्य अनुवाद
९९२२९८६३८६