Sunday, 14 June 2015

स्वराज्याचे हिरे




                                           तमाम स्वराज्य प्रेमी शिवपाईकांस विनम्र आवाहन                                    स्वराज्याचे हिरे या उपक्रमात सहभागी व्हावे व आपला सहयोग द्यावा !

Saturday, 13 June 2015

महाराजांच्या तलवारीचा शोध

महाराजांच्या तलवारीचा शोध 
परदेशातील महाराजांची रत्नजडीत तलवार स्वराज्यात आणावी 
छत्रपती शिवराय जी तलवार वापरत असत त्या एक नसून जास्त होत्या अशी माहिती समोर आली. काहीच्या मते दोन होत्या तर काहिंच्या मते चार होत्या संशोधकांनी इग्लंडच्या मुजिअम मध्ये असलेली तलवार हीच शिवरायांची तलवार असून ती परत करावी. यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. वास्तविक ती तलवार कोल्हापुर संस्थानच्या माध्यमातून इंग्रज अधिकाऱ्या मार्फत भेट म्हणुन इग्लंडला पोहचली. दुसरी तलवार ही तलवार ही सातारचे छत्रपती उदयनराजे भोसले यांच्याकडे असून ती देखील छत्रपती शिवरायांची तलवार असल्याची माहिती समोर येते. तसेच काही संशोधकांनी प्रसिद्धीसाठी प्रतापगडावरिल भवानी मंदिरात असलेली तलवार शिवरायांची असल्याची माहिती सांगितली. परंतु वास्तविक ती तलवार सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची असून तशी माहिती प्रसिद्धी झालेली आहे. शिवकाळांत स्पेन मधुन भारतात तलवारीची आयात होत असत तशाच स्वरूपाची शिवरायांची तलवार स्पेन बनावटीची असल्याची माहितीही समोर आली आहे. वास्तविक यातील कोणतीही तलवार शिवरायांनी किंवा शिवरायांचीच आहे अशी पुराव्यानिशी ठाम माहिती समोर आलेली नाही.छत्रपती शिवरायांनी ज्या एका किंवा जास्त तलवारीचा वापर करून स्वराज्य उभारले त्याची सत्य खात्रीशीर,माहिती शोध घेण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची असून शिवराज्याभिषेक दिनी संस्थानच्या वतीनी प्रसिध्द केलेल्या प्रत्रकात सदराची मागणी केली आहे. तरी या संदर्भात आपणाकडे काय माहिती                                                                            असल्यास सहकार्य करावे.
                                                                                                                                   राजेश खडके

Friday, 12 June 2015

आपण गप्प बसायचे काय ?

छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा बारा बलुतेदारी व अठरा पगड जातींना बरोबर घेऊन स्वराज्य निर्माण करणारा इतिहास आहे हे आपण प्रथम लक्षात घेतले पाहिजे . परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सांगणारे व लिहणारे हिंदु धर्म पंडित छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांची बदनामी करताना दिसत आहे. आपल्या राजाची बदनामी होत असताना दिसत आहे मात्र आपण फक्त उघड्या डोळ्यांनी पहात आहे असे का ? आपण हिंदु आहोत म्हणुन आपले चुकले आहे काय ? असाच प्रश्न आज हिंदु तरुणां पुढे उभा राहिला आहे ? कारण बदनामी होताना तर दिसत आहे पण आपण हिंदु आहोत आणि बदनामी करणारे बामन म्हणून आपण गप्प बसायचे काय ? असा प्रश्न त्या तरुणां पुढे राहिला उभा आहे. याचे उत्तर कोण देणार असा माझा प्रश्न आहे