Wednesday, 13 December 2017

समतावादी स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या हत्येचा बदला... १ जानेवारी १८१८ भीमा कोरेगाव इतिहासात नोंद



शहाजीराजे यांनी १६१६-१७ मध्ये पुणे (निजबत मुंजेरी) येथील हाडकीच्या (महार समाजाच्या) जागेत लाल महाल बांधला.”नागरवास” गावात हत्तीच्या वजना एवढी तुळा करून तेवढ्या वजनाचे सोने चांदी धन धान्य गोरगरीब रयतेला देऊन स्वराज्याची संकल्पना निर्माण केली. तुळा केले वरून ”नागरवास” गावचे नाव “तुळापुर” पडले.१९ फेब्रुवारी १६३० मध्ये शिवनेरी येथे शिवरायांचा जन्म झाला.शहाजीराजे यांचे सहकारी नेताजी पालकर - वीर बाजी पासलकर – शेलारमामा यांचेकडून शिवरायांना युध्द कलेचे शिक्षण मिळाले.आता संकल्पित स्वराज्य अस्तित्वात आणण्याची वेळ आली होती.“प्रचंडगड” याचे रायनक परवारी महार राजे शहाजीराजे यांचे सहकारी होते.शहाजीराजे यांच्या संकल्पित स्वराज्यासाठी “प्रचंडगड” शहाजीराजे यांचेकडे स्वाधिन करण्याचे रायनक परवारी यांचे “वचन” होते.आता संकल्पित स्वराज्य स्थापन करण्याची वेळ आली होती.शहाजीराजे यांनी गौतम बुद्धांचा भगवा विचार आणि सम्राट अशोक यांच्या समतावादी लोकशाही लोकहितवादी राज्याचे भगवे निशाण शिवरायांच्या हातामध्ये देऊन माता जिजाऊ यांचे सोबत नेताजी पालकर - वीर बाजी पासलकर – शेलारमामा यांना शिवगंगा खोऱ्यामध्ये रायनाक परवारी यांचे नावे लखोटा देऊन पाठविले.वीर बाजी पासलकर यांचा मांग दरीतील सहकारी यल्या मांगाला बरोबर घेऊन रायनाक परवारी यांचेकडे लखोटा सोपवून  “प्रचंडगड” स्वराज्याच्या स्वाधिन करून यल्या मांगाच्या हातून स्वराज्याचे पहिले तोरण म्हणून प्रचंडगडावर पहिले भगवे निशाण उभारले....आणि त्याचे पुढे नामकरण झाले ते “तोरणगड” या तोरणागडाचा म्हणजे स्वराज्याचा पहिला गडकरी म्हणून शिवरायांनी यल्ल्या मांगाची निवड केली.शिवरायांच्या स्वराज्यात दोन सरदार कार्यरत होते एक होता तो “मराठी सरदार” म्हणजे अठरा पगड अलुतेदार आणि बारा बलुतेदार होय.त्यामध्ये सुरुवातीचे “मराठी सरदार” म्हणजे रायनाक परवारी आणि यल्ल्या मांग आहेत.आणि दुसरा होता तो “मराठा सरदार” त्यामध्ये होते ते मराठा....! स्वराज्याचे पहिले सरसेनापती म्हणून वीर बाजी पासलकर यांची शिवरायांनी निवड केली.नेताजी पालकर – वीर बाजी पासलकर – हैबतराव शिळीमकर हे स्वराज्याचे पहिले “मराठी सरदार” होय.शिवरायांनी काशीच्या गागा भट्टा कडून पहिला राज्यभिषेक करून घेतला.मात्र ब्राह्मण धर्माने त्यांना राजा मानण्यास नकार दिला होता.....कारण शिवराय हे “महार राजे” होते.संभाजी राजांच्या सांगण्यावरून शिवरायांनी पहिला राज्याभिषेक नाकरून दुसरा राज्यभिषेक शाक्त धर्म पध्दतीत करून घेऊन समतावादी पर्व सुरु करून मनुस्मृतीने लादलेली सप्त बंदी मोडण्याची सुरुवात त्यानी केली.सनातनी धर्मावरील हल्ला वैदिक धर्म पंडितांना रुचणारा नव्हता त्यानी स्वत:चा सनातनी धर्म प्रस्थापित करण्यासाठी गौतम बुद्धांची हत्या करून एक लाख बौध्द भिकुंच्या कत्तली त्यांनी केल्या होत्या.वारकरी सांप्रदायाची स्थापना करणारे संताची हत्या त्यांनी केली होती ते गप्प बसणारे नव्हते.त्यांचेकडे त्यांचे गुलाम म्हणून स्वराज्याचे विरोधक राजपूत मराठा होता.त्यांना बरोबर घेऊन त्यांनी रायगडावर संभाजीराजे नसताना छत्रपती शिवाजी महाराज यांचेवर विषप्रयोग केला त्यात त्यांची हत्या झाली.मराठा सरदार हंबीरराव मोहिते यांनी या मारेकऱ्याना अटक करून संभाजी महाराज यांचे समोर हजर केले.संभाजीराजे यांना त्यांना तुरुंगात टाकण्याचे आदेश केले....आणि संभाजीराजेनी त्यांचा राज्यभिषेक शाक्त धर्म पध्दतीत करून ते छत्रपती झाले.त्यानी शिवाजी महाराज यांच्या मारेकरी यांनी चार वर्ष सुनावणी चालवून दोषी ठरल्यानंतर छत्रपती संभाजी महाराज यांनी मनुस्मृती लादलेले सप्त बंदी मोडून त्यानी समतावादी स्वराज्य विस्तार मोठ्या प्रमाणात वाढविला.सनातन्यांना याचा खूप राग आला होता त्यांना त्यांचा सनातनी धर्म पुन्हा धोक्यात आल्याची जाणीव झाली त्यानी रजपूत मराठा यांना बरोबर घेऊन संभाजीराजांची हत्या करण्याचे षड्यंत्र सुरु केले तीन वेळा संभाजीराजाना विषप्रयोग करण्याचा प्रयत्न सुरु केला....परंतु संभाजी महाराज त्यातून बचावले.मग त्यांनी शिवाजी महाराज यांनी उभी केलेली गुप्तचर यंत्रणा पोखरण्यास सुरु केले त्यामध्ये आपले गुलाम रजपूत मराठा घुसविण्याचे कटकारस्थान सुरु केले.स्वराज्याचे “मराठा सरदार” गुपचूप पध्दतीत संपविण्याचे कार्य जोरात सुरु झाले.त्यांना माहित होते की संभाजी महाराज संपले की स्वराज्य संपणार आहे आणि ते आपल्या ताब्यात येणार आहे.औरंगाजेबाचे स्वराज्य ताब्यात घेण्याचे खूप जूने स्वप्न होते.रजपूत मराठा आणि वैदिक धर्म पंडितांनी औरंगाजेबास त्याचे स्वप्न पूर्ण करण्याचे लालच दिले.तेव्हा संभाजी महाराज यांना पकडून देण्याचे आश्वासन या लोकांनी दिले...त्याला ते मान्य झाले.संगमेश्वर येथील शृंगारपुरात संभाजी महाराज गेले होते....त्यांचे बरोबर त्यांचे काही निवडक लोक बरोबर होते...त्यामध्ये संताजी घोरपडे होता.पूर्व नियोजित कटकारस्थाना नुसार संभाजी महाराज यांना औरंगाजेबाच्या अडीच हजार सैनिकांना धरून दिले....तेथून ठरल्याप्रमाणे संताजी घोरपडे पळून गेला.सनातनी यांनी ठरल्याप्रमाणे जेरबंद संभाजी महाराज यांना ७०० कि.मी चा प्रवास करीत ३८ दिवस धिंड काढीत स्वराज्य संकल्पित “तुळापुर” येथे आणले.औरंगाजेबास मनुस्मृती प्रमाणे शिक्षा देण्यास भाग पाडले....त्याच्याकडून आपल्या मनाप्रमाणे छत्रपती संभाजी महाराज यांना हालहाल करून त्यांची “तुळापुर” येथे हत्या करून स्वराज्य संपवून पेशवाईची मुहूर्तमेढ रोवली गेली.एका राजाची एवढी अमानुष हत्या आपल्याकडून करून घेतली त्याला त्याचा पश्चाताप झाला....स्वराज्य संपले होते.मनुवादी विचारांनी समतावादी संभाजी महाराज यांना औरंगजेबाच्या माध्यमातून धर्मवीर बनविण्यात आले.स्वराज्याच्या दोन गाद्य निर्माण करण्यात आल्या.एक गाडी सातारा येथे तर दुसरी गादी कोल्हापूर येथे हलविण्यात आली.छत्रपती शिवाजी महाराज यांची संभाजी महाराज यांनी बांधलेली समाधी दुर्लक्षित करण्यात आली.लाल महालावर ताबा मारून त्याचा शनिवार वाडा करण्यात आला.शनिवार वाड्यातून स्वराज्याची सूत्रे हळू लागली स्वराज्याचे “मराठा सरदार” यांना भूलविण्यात आले.स्वराज्य चालवीत असल्याचा भ्रम निर्माण करण्यात आला. “मराठा सरदार” सरदार संपविण्यासाठी पेशवाईकडून सूत्रे हलविण्यात येऊ लागली.संभाजी महाराज यांची हत्या औरंगजेबाने स्वराज्य म्हणून केली असे बिंबविण्यात आले....आणि पानिपतचे युध्द घडवून स्वराज्यातील एक लाख घरामध्ये बांगड्या फोडण्यास भाग पाडले.....आता “मराठा सरदार” संपला होता.पेशवाईने “मराठी सरदार” संपविण्यासाठी पराकोटीचा जातीवाद निर्माण केला.सातारा गादीचे छत्रपती शाहू महाराज यांचेकडे भोरचे “मराठी सरदार” म्हणून सिद्धनाक महार होते.आता पेशवा “रजपूत मराठा” यांचे माध्यमातून राजा झाला होता....त्याने स्वराज्याचे टाकसाळ (चलन) बंद करून स्वत:ची टाकसाळ (चलन) निर्माण केली होती.पेशव्याची स्वराज्याची गद्दारी आता पुढे आली होती.छत्रपती संभाजी महाराज यांच्या हत्येची खरी उकल स्वराज्याला झाली होती....ते समतावादी विचारांचे होते आणि त्यांनी सप्तबंदी मोडून मनुस्मृतीला विरोध केला होता....म्हणून औरंगजेबाच्या माध्यमातून मनुस्मृती प्रमाणे त्यांना शिक्षा देऊन हत्या केल्याची माहिती शाहू महाराजांना आणि “मराठी सरदार” यांना झाली होती.शाहू महाराजांनी सिद्धनाक महार या मराठी सरदाराला बोलावून घेतले होते.....आणि त्याला आदेश केले की,आता संभाजी महाराज यांच्या हत्येचा बदला घेण्याची वेळ आली आहे.पराकोटीचा जातीवाद निर्माण करणारा पेशवा संपविण्याची वेळ आली आहे.तेव्हा सिद्धनाक महार याने स्वराज्यातील अडीचशे इतर “मराठी सरदार” यांना प्रत्येकी १०० ठोकळ गडी भीमा कोरेगाव याठिकाणी घेऊन येण्यास सांगितले होते.नगर मधून ब्रिटीश फलटण खडकी येथे युध्द करायला निघाली होती.....त्यांना भीमा कोरेगाव येथील युध्दाची माहिती मिळाली होती.त्या फलटण मध्ये ५०० महार सैनिक होते त्यांनी भीमा कोरेगाव येथे आपल्या भाऊबंदा बरोबर पेशव्याच्या विरोधात लढण्याचे ठरविले.“मराठी सरदार” सिद्धनाक महार यांच्या नेतृत्वाखाली लढण्यास सामील झाले.आता मराठी सरदार यांच्या नेतृत्वाखाली २५ हजार ५०० सैनिक लढण्यास तयार झाले होते.पेशव्या बरीबर रजपूत मराठा होता....युध्द सुरु झाले मराठी सरदार समोर येणाऱ्या रजपूत मराठ्यांना आडवे करीत चालला होता.संभाजी राजांच्या हत्येने रक्ताने माखलेले भीमा नदी रजपूत मराठ्यांच्या रक्ताने धुवून निघत होती....आता लाल महाला वरील शनिवार वाड्याच्या माध्यमातून स्वराज्यावरील ताबा उठण्याची वेळ आली होती....अखेर पेशवा हरला आणि तो पळून गेला.याची खबर शनिवार वाड्यातील पेशव्याचा वंशज नातू याला कळाली त्याच्या लक्षात आले की,सिद्धनाक महार पुन्हा एकदा स्वराज्याचे भगवे निशाण शनिवार वाड्यावर उभारून लाल महालाचे अस्तित्व उभे करणार...! लागलीच त्याने लाल महाल जाळला....आणि ब्रिटीशांचा युनियन जॅक उभारून त्याने शरणागती पत्करली.शहाजीराजे संकल्पित स्वराज्य शिवराय स्थापित स्वराज्य समतावादी स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांची मनुस्मृती प्रमाणे हत्या करून स्वराज्य संपवून उभी राहिलेली पेशवाई मराठी सरदार यांनी संपवून समतावादी स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या हत्येच्या बदल्याची तारीख १ जानेवारी १८१८ इतिहासात नोंद केली.त्या ५०० महार सैनिकांचा इतिहास अमर रहावा यासाठी ब्रिटीश सरकारने भिमा कोरेगाव याठिकाणी त्यांच्या स्मरणार्थ “विजयस्तंभ” उभारला आहे.डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी त्या विजयस्तंभाला भेट देऊन अभिवादन करून त्यांनी असे वकतव्य केली की जो इतिहास वाचणार नाही तो इतिहास घडविणार नाही.अशा पराकोटीचा जातीवाद असणारी आणि समतावादी स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांची ज्या मनुस्मृती प्रमाणे हत्या केली त्याच मनुस्मृतीचे दहन करून संविधानाच्या माध्यमातून स्वतंत्र भारताला संविधान देत असतांना संसदेतील भाषणात असा उल्लेख केला की,सम्राट अशोक आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे राज्य लोकशाही लोकहितवादी होते म्हणून मला संविधान लिहिण्यास सहज शक्य झाले.तेव्हापसुन आपण आपल्या ऐतिहासिक महार योध्यांचा इतिहास जागृत ठेवण्यासाठी भीमा कोरेगाव याठिकाणी जाऊन त्यांच्या शौर्याच्या “विजयस्तंभ’’ येथे अभिवादन करतो.
राजेश खडके
समन्वयक
सकल मराठी समाज

Wednesday, 29 November 2017

छत्रपती संभाजीराजांच्या हत्येच्या कटात वैदिक धर्म पंडितांचे रजपूत मराठे......! छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येच्या बदल्याची तारीख १ जानेवारी १८१८ इतिहासात नोंद झाली.





आतापर्यंत बरेच इतिहासकार आणि संशोधकांनी केलेले संशोधन पाहिले त्यांनी लिहिलेली पुस्तके वाचली त्यातील जर कोणाचे कौतूक करावेसे वाटले तर लेखक चंद्रशेखर शिखरे यांचेच करावे असे मला एक विश्लेषक म्हणून वाटत आहे.त्याचे कारण असे आहे की,छत्रपती संभाजी महाराजांची हत्या कशी झाली यावर त्यांनी संशोधन करून छत्रपती संभाजीराजांची संघर्ष गाथा (चित्रमय) हे पुस्तक जिजाऊ प्रकाशन यांचे वतीने प्रकाशित केले आहे.त्यांच्या त्या लिखाणावरून स्वराज्यात तीन प्रकारचे “मराठा” आढळून येतात.एक जो छत्रपती शिवाजी महाराज यांचे बरोबर प्रामाणिक स्वराज्यात होता.तो मराठा “जगदंब”ला मानतो.....आणि शिवराय नेहमी “जगदंब”च म्हणायचे त्यांनी “भवानी” हा शब्द कधीही उच्चारला नाही......आणि दुसरा होता तो “रजपूत मराठा” याने कधीही शिवरायांना आपले मानले नाही....नेहमी त्यांच्या विरोधातील कारवाया मध्ये सहभागी असायचा आणि हा “रजपूत मराठा” वैदिक धर्म पंडितांचा मानसिक गुलाम होता व आहे....हा “भवानी”ला मानणारा समाज आहे.जी “भवानी” जिने छत्रपती शिवाजी महाराज यांना साक्षात दुष्टांत देऊन शत्रूचा नाश करण्यासाठी तलवार दिली असे वैदिक धर्म पंडितांचे म्हणणे आहे.त्यांच्या सांगण्यावरून सत्य मानणारा आणि ते जे सांगतील ते तो करणारा मराठा म्हणजे  “रजपूत मराठा” होय.आणि हा रजपूत मराठा मरेपर्यंत बामनाना कधी सोडत नाही...ते वैदिक धर्म पंडितांना आपल्या जीवनाचा शिल्पकार मानीत असतात.वैदिक धर्म पंडितांनी याच “रजपूत मराठा” यांचे माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज यांची हत्या करून.....त्यांचे अंत्यदर्शन रयतेला होऊ दिले नाही.याच “रजपूत मराठा” यांच्या हातून प्रामाणिक मराठा सरदार यांच्या हत्या घडविल्या.....जे सापडले त्यांना छत्रपती संभाजी महाराज यांनी हत्तीच्या पायी दिले.काहींचा कडेलोट केला तर काहीना सुळावर चढविले.अशा संभाजीराजांना या “रजपूत मराठा” सरदार यांनी वैदिक धर्म पंडिता बरोबर राहून औरंगजेबाच्या सरदाराकडून पकडून दिले.हेच “रजपूत मराठा” वैदिक धर्म पंडित यांचे बरोबर होता......म्हणून त्यांना संभाजीराजांना मनुस्मृती प्रमाणे शिक्षा देता आली.त्यांना जो वाचवयाला जाणार त्यांचे शीर हेच “रजपूत मराठे” अलग करीत असे....वढू येथे संभाजीराजांना वाचविण्यासाठी पाच “मराठी सरदार” (धनगर) यांनी हल्ला केला असता,याच “रजपूत मराठा” यांनी त्यांचे शीर धडापासून अलग केले.
   या “रजपूत मराठा” सरदार आणि वैदिक धर्म पंडितांना माहित होते की,संभाजीराजे संपले की,स्वराज्य वाचवायला कोणी राहणार नाही.....परंतु त्याला जर संपवायचे असेल तर स्वराज्य संपले पाहिजे.असा मनसुबा त्यांनी त्यांचे डोळ्या समोर ठेऊन पूर्वनियोजित कटकारस्थान केले होते.त्याप्रमाणे त्यानी छत्रपती संभाजी महाराज यांची ३८ दिवस धिंड काढून स्वराज्यात मोठी दहशत या “रजपूत मराठा” यांनी केली होती.अशा वैदिक धर्मीय “रजपूत मराठा” यांना न घाबरता छत्रपती संभाजी महाराज यांचे तुकडे गोळा करून ते शिवून त्यांचा अंत्यसंस्कार महार समाजाने केला होता.....त्यानंतर औरंगाजेब पश्चातापाच्या खाईत खोलवर रुतत गेला..आणि त्याने पुन्हा कधीही हल्ला स्वराज्यावर केला नाही....कारण आता स्वराज्य संपले होते.औरंगाजेबाला कधीही स्वराज्य जिंकता आले नाही....अखेर त्याने मृत्यूला कवटाळून घेतले.वैदिक धर्म पंडितांचे कटकारस्थान “रजपूत मराठा” यांनी पूर्ण केले.लाल महालावर ताबा मारून बसलेला पेशवा आता या “रजपूत मराठा” यांचा राजा झाला होता......आणि राहिले साहिलेले स्वराज्याचे मराठे या पेशव्याने संपविण्याचे कार्य सुरु केले....त्यामध्ये प्रमुख मराठा सरदार स्वराज्याचा पहिला सरसेनापती वीर बाजी पासलकर यांच्या वंशजाना या पेशव्याने शिवगंगा खोऱ्यातील वतन काढून घेऊन त्यांना मोसे खोऱ्यात हाकलून दिले.स्वराज्याचे पहिले तोरण चढविणाऱ्या मांगदरीतील  यल्ल्या मांगाच्या वंशजाना “रजपूत मराठा” बनवून त्यांना मांगडे केले.जीवा महाराला “महाले” करून महार समाजातील अस्तित्व संपविण्याचा घाट घातला.अशा बऱ्याच घटना घडविल्या गेल्या आहेत...यातील इतिहासातील महत्वाची आणि मोठी गोष्ट म्हणजे ज्या शहाजीराजे यांनी १६१६ मध्ये “निसबत मुंजेरी” म्हणजे पुण्यामध्ये लाल महाल बांधला....आणि “नागरवास” गावामध्ये हत्तीच्या वजनाची तुळा करून तेवढे वजना एवढे सोने चांदी धन धान्य गोरगरीब लोकामध्ये वाटून स्वराज्य संकल्पित करून त्या गावचे नाव “तुळापुर” असे नामकरण झाले.त्याच तुळापुर मध्ये छत्रपती संभाजी महाराज यांची हत्या करून स्वराज्य संपविले.आणि दुसरी महत्वाची घटना म्हणजे शहाजीराजे यांचे संकल्पित स्वराज्य छत्रपती शिवाजी महाराज यांनी निर्माण केले.स्वराज्यावर चालून आलेल्या अफजलखानाचा कोथळा काढून त्याचा वध केला....त्याचा सन्मान म्हणून त्याची कबर बांधून दिवाबत्तीची सोय केले.....आजपर्यंत ती दिवाबत्ती त्या प्रतापगड पायथ्याशी जळत आहे.मात्र छत्रपती शिवाजी महाराज यांचे रयतेला अंत्यदर्शन नहोऊ दिले नाही....संभाजीराजांनी बांधलेली समाधी या वैदिक धर्म पंडितांच्या “रजपूत मराठा” यांनी उध्वस्त करून ती झाकून टाकून त्यांचा इतिहास बुजविला होता....कोणालही त्या समाधी जवळ जाण्याची मुभा नव्हती.हळू हळू छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे समतावादी स्वराज्य संपविण्यासाठी वीर “मराठी सरदार” महार समाजाला गावापासून दूर करण्याचे कटकारस्थान जोरात सुरु झाले....पराकोटीचा जातीवाद सुरु झाला.या वैदिक धर्म पंडितांनी “रजपूत मराठा” यांच्या माध्यमातून त्यांचेवर अन्याय अत्याचार जोरात सुरु केले.स्वत:चे या समाजावर अधिष्टान निर्माण करण्यासाठी गणपती नावाचा मोदक खाणारा गणपती याचे आठ मंदिर या पेशव्याने निर्माण केले होते.परंतु “मराठी सरदार” यांच्या मनात स्वराज्य खेळत होते.आता साताऱ्यातून स्वराज्याची धुरा सुरु होती....आणि पुण्यातून म्हणजे शनिवार वाड्यातून स्वराज्य धुरा संपविण्याचे कार्य सुरु होते.
   छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी दुर्लक्षित झाली होती.परंतु छत्रपती संभाजी महाराज यांची हत्या आजही “मराठी सरदार” यांच्या मनात सलसलत होती.भोरचे महार सरदार सिद्धनाक महार सातारा गादीचे छत्रपती शाहू महाराज यांचे ते “मराठी सरदार” होते.पेशव्याने स्वत:ची “टाकसाळ”(चलन) सुरु केली होती.याची खबर छत्रपती शाहू महाराज यांना झाली होती.त्यांनी सरदार सिद्धनाक महार यांना बोलावून घेतले होते....आणि त्यांना सांगितले की,आता पेशवाई संपवायची वेळ आहे....स्वराज्य बुडव्यांना धडा शिकविण्याची वेळ आली आहे.पेशवाई संपवून ती स्वराज्यात जोडून घे. छत्रपती शाहू महाराज यांचे आदेशावरून सरदार सिद्धनाक महार याने स्वत:चे निवडक असे २५० (अडीचशे) लोकांना प्रत्येकी १०० ठोकळ गडी घेऊन भीमा कोरेगाव याठिकाणी येण्याचे सांगितले.याची खबर ब्रिटीश सरकारला झाली होती.....त्यानी पेशवाईवर चढाई करण्याचे ठरविले होते....तेही त्याठिकाणी आले.अडीचशे लोकांचे प्रत्येकी शंभर गडी म्हणजे पंचवीस हजार लोक सरदार सिद्धनाक महार घेऊन आला होता.त्या ब्रिटीश सैन्यामध्ये ५०० महार सैनिक होते.त्यांना आपले भाऊबंध स्वराज्याचा विरोधक पेशवा याचे विरोधात लढण्यासाठी आलेला पाहून तेही पेशव्याच्या विरोधात लढण्यासाठी सरदार सिद्धनाक महार याच्या नेतुत्वात सामील झाले. पेशवा “मराठी सरदार” यांच्या विरोधात लढण्यासाठी “रजपूत मराठा” यांना घेऊन भीमा  कोरेगाव याठिकाणी आला होता.जेथे छत्रपती संभाजी महाराज यांची धिंड काढून हत्या करण्यात आली होती.तेव्हा उघड्या डोळ्यांनी संभाजीच्या हत्येचा खेळ हा “रजपूत मराठा” पाहत आनंद घेत होता आज पेशवाईला वाचविण्यासाठी हाच “रजपूत मराठा” लढण्यासाठी समोर आला होता. छत्रपती संभाजी महाराज यांच्या हत्तेचा बदला घेण्याची वेळ आली होती.पंचवीस हजार पाचशे महार योद्धे पेशवाईच्या “रजपूत मराठा” सरदार यांचेवर तुटून पडली होती.हा हा म्हणत प्रत्येक महार योद्धा त्या “रजपूत मराठा” सरदारचे मुंडके शरीरापासून दूर करीत होती. छत्रपती संभाजी महारांच्या रक्ताने माखलेली नदी “रजपूत मराठा” सरदारांच्या रक्ताने धुवून निघत होती. छत्रपती संभाजी महाराज यांच्या हत्तेचा घेतलेला बदला त्या वीर मराठी सरदार यांना आनंद देत होती...जस जसे या “रजपूत मराठा” सरदारांचे ध्येय आडवे होऊ लागले तसतसे स्वराज्याची माती सुखी होऊ लागली होती. भीमा कोरेगावची लढाई पेशवे हरल्याची बातमी शनिवार वाड्यावर धडकली ....आता स्वराज्याचा भगवा पुन्हा लाल महालावर चढविला जाणार होता.परंतु लाल महालाचा झालेला शनिवार वाडा सरदार सिद्धनाक महार या मराठी सरदारच्या हातात पेशव्याला द्यायचा नव्हता.....कारण तो पुन्हा लाल महाल झाला असता...! म्हणून शनिवार----याने जाळून टाकला आणि नातू याने ब्रिटीश जॅक शनिवार वाड्यावर चढवून तो ब्रिटीशांच्या ताब्यात देऊन पेशव्याने ब्रिटिशा समोर शरणागती पतकरली.छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येच्या बदल्याची तारीख १ जानेवारी १८१८ इतिहासात नोंद झाली.

Monday, 6 November 2017

संभाजी ब्रिगेडचे ७२ मावळे इतिहासातून गायब.....सर्वत्र आनंदोत्सव साजरा....! छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येपासून...आपण “बलिदान” नावाची बाबच विसरलेलो आहे काय...?



 
जेम्स लेन नावाचा एक विदेशी लेखक होता,,,,त्याने “द हिंदू किंग इस्लामिक इंडिया” नावाचे एक पुस्तक लिहिले होते.या पुस्तकामध्ये माता जिजाऊ आणि छत्रपती शिवराय यांचे बदनामीकारक लिखाण केले होते....लिखाण इतक्या खालच्या पातळीवर झाले होते की,जन्म घेतलेल्या प्रत्येक माणसाला त्याचा संताप येणारच....आजच्या बोली भाषेत म्हणायचे झाले तर आपल्याला नुसते कोणी “तुझ्या आईला” असे म्हटले तरी प्रत्येक व्यक्तीचे मस्तक हलल्या शिवाय रहात नाही....आणि माता जिजाऊ तर स्वराज्याच्या माता होत्या…..त्यांच्या बदनामीचा राग तर प्रत्येकाला येणारच.....! विषय असा आहे की,भारतीय निवासी यांचेवर या ब्राह्मणी व्यवस्थेने पूर्वीपासून हल्ला केला आहे...त्रास दिलेला आहे.सामान्य जनता कुटुंबाच्या चौकटीतून बाहेर यायला तयार नाही.त्यांना स्वत:च्या आत्मबलावर विश्वास राहिलेला नाही.त्याने आपले जीवन तेहतीस कोटी देवांच्या हातामध्ये दिलेले आहे...त्या तेहतीस कोटी देवांच्या नावावर सर्व सामान्यांना वेड्यात काडून भरकटायला लावणारी ब्राह्मणी व्यावस्थेवर विश्वास ठेऊन आपल्या जन्म दिलेल्या आई पेक्षा तो अशा भुरट्या बामनावर विश्वास ठेऊन आपल्या जीवनाचे बलिदान करीत असतो.अश्या ब्राहमणी व्यावस्थेने असुरवंशीय बळीराजापासून ते गौतम बुद्धापासून ते छत्रपती संभाजी महाराज यांचे पर्यंत हत्या घडविलेल्या आहेत....आणि हत्या केल्या आहेत.महापुरुषांची बदनामी करणे हे त्यांचे “ब्रह्म अस्त्र” आहे. छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर याच अस्त्राचा भयानक वापर करून त्यांनी त्यांचे कर्तुत्व संपविण्याचा प्रयत्न केला होता.त्यांच्यावर याच मनुवादी विचारांनी तीन वेळा विषप्रयोग केला होता. छत्रपती शिवाजी महाराजांना ज्यांनी विषप्रयोग करून हत्या केली अशा लोकांना संभाजीराजांनी हत्तीच्या पायाखाली देऊन काहींचा कडेलोट करून तर काहीना सुळावर चढवून शिक्षा दिली.मात्र याच लोकांच्या वंशजानी मनुस्मृतीनुसार संभाजी महाराजांना हाल हाल करून मारले.अशा लोकांचे अधिष्टान असणारा मोदक खाणारा गणपती आपला पूजक करून प्रत्येकाच्या घराच्या देवाऱ्यात नेऊन बसविला आहे.मग तो टिळकांचा असो किंवा भाऊ रंगारीचा असो......शेवटी संभाजी ब्रिगेडच्या सामजिक संघटनेचा पक्ष झालेल्या लोकांनी तुम्हा आम्हाला “सुखकर्ता आणि दुख:हर्ता” म्हणायला लावले आहे.ज्या गणपतीने स्वराज्य संपविले तुमच्या आमच्या पासून माता जिजाऊ – छत्रपती शिवाजी महाराज – संभाजी महाराज दूर केले.त्यांनाच आज आपण ब्रह्मा विष्णू महेश राम कृष्ण गौरी गणपती म्हणून पुजत आलेलो आहे.सत्यनारायण महापूजा करून आपले जीवनातील स्वराज्यातील अस्तित्व आपण संपवीत आहोत.असे का घडले आहे...? आणि असे का घडत आहे...? याचा विचार कोणी करीत नाही.आपण “बलिदान” नावाची बाबच का विसरलो आहे...? हे मला आज कळायला मार्ग नाही.मी जेव्हा छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास वाचला तो आत्मसात केला तेव्हा मला अक्षरशः रडू कोसळले.....माझे मन हेलावून गेले.त्याचे तसे कारणही आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येपासून...आपण “बलिदान” विसरलेलो आहे.शहाजीराजे यांनी पुणे प्रांतातील “नांगरवास” या गावी हत्तीच्या वजनाची तुळा करून त्याच्या वजना एवढे सोने चांदी गोरगरीब दुष्काळग्रस्त रयतेसाठी देऊन त्यांना मदत केली....आणि  तुळा केलेवरून याच “नांगरवास” गावाचे “तुळापुर” असे नामकरण झाले.आणि याच तुळापुरमध्ये शहाजीराजांनी स्वराज्य संकल्पित केले.त्यामुळे खरी स्वराज्यची पायाभरणी शहाजीराजांनी याच तुळापुर मध्ये केली होती...परंतु ब्राह्मणी व्यावस्थेने मुगल सरदार “मुरार जगदेव” या धर्म पंडिताने हत्तीच्या वजनाची तुळा केली असल्याचे जाहीर केलेले आहे.जर हा मुरार जगदेव एवढा रयतप्रिय होता.तर त्याने लाल महालावर हल्ला करून पुणे प्रांत बेचीराग कसा काय केला असा माझा प्रश्न आहे.त्यामुळे शहाजीराजे आणि स्वराज्याचा काहीही संबध येत नाही.शहाजीराजे मोघलांचेच फक्त मांडलिक कसे होते हे दाखविण्याचा प्रयत्न केलेला आहे.लाल महाल आणि दादोजी कोंडदेव यांचा कोणताही संबध नसताना पुणे महानगरपालीकेच्या वतीने बनावट उभा केलेल्या लाल महालामध्ये दादोजी कोंडदेव बनावट उभा करून माता जिजाऊची बदनामी करण्यासाठीच हा प्रकार केल्याचे इतिहासकार व संशोधक यांच्या समोर आले होते.याचाच फायदा घेऊन भांडारकर इतिहास संशोधन मंडळातील बारा धर्म वैदिक पंडितांनी अशी माहिती पुरविली की,दादोजी कोंडदेव हा छत्रपती शिवराय यांच्या कुटुंबातील अविभाज्य घटक आहे....आणि त्या लेखकाने तसे लिखाण त्याचे पुस्तक “द हिंदू किंग इस्लामिक इंडिया” यामध्ये केले आहे.आता हे पुस्तक इंग्रजीमध्ये आहे त्यामुळे सामान्य लोकांना ते लवकर समजणार नव्हते.छत्रपती संभाजी महाराज यांचेवर मनुवादी बामनानी केलेले अत्याचार आणि त्यांची औरंगाजेबाच्या माध्यमातून केलेली अमानुष हत्या त्यामुळे पुरुषोत्तम खेडेकर यांनी काही तरुण उभे करून तुळापुर येथील संभाजी महाराज यांचे समाधीला साक्ष ठेऊन “संभाजी ब्रिगेड” या नावाची संघटनेची स्थापन केली.याच संघटनेच्या ७२ कार्यकर्त्यानी भांडारकर इतिहास संशोधन मंडळावर हल्ला करून अशा बनावट इतिहासाची तोडफोड केली...त्या ७२ कार्यकर्त्यांना पोलिसांनी तोडफोड केल्याप्रकरणी अटक केली.ही बातमी वाऱ्यासारखी संपूर्ण महाराष्ट्रात पसरली गेली.सदर विषयावर खूप मोठा उहापोह झाला त्या बारा बामनावर कारवाई करून सदरच्या पुस्तकावर बंदी घालण्याची मागणी जोर धरु लागली जनता कारवाई होण्याची वाट पहात होती. “संभाजी ब्रिगेड” च्या त्या ७२ कार्यकत्यांना आता लोक मावळे म्हणू लागली....त्यांची नोंद इतिहासाच्या पानामध्ये झाली.त्यानंतर सर्व ७२ मावळे जामिनावर बाहेर आले न्यायालयाच्या पायऱ्या चढणे उतरणे सुरु झाले.संभाजीराजांच्या छाव्यांनी दादोजी कोंडदेव या बनावट वैदिक धर्म पंडितांचा पुतळा लाल महालातून बाहेर काढून टाकला.आता वैदिक धर्म पंडित मुक्त लाल महाल झाला होता....आता खरा लाल महाल शोधण्याची प्रक्रिया सुरु झाली होती.आताचा शनिवार वाडा पूर्वीचा लाल महाल होता असे पुरावे बाहेर येऊ लागले होते.शनिवार वाड्याला लाल महाल घोषित करा अशी मागणी पुढे येऊ लागली. भांडारकर इतिहास संशोधन मंडळावर झालेल्या हल्लेचा निकाल जाहीर झाला आणि संभाजी ब्रिगेडच्या ७२ मावळ्यांची निर्दोष सुटका करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले.सर्वत्र आनंदोत्सव उत्सव साजरी करण्यात आला.परंतु हा आनंदोत्सव साजरी करण्याचा विषय नाही असे मला वाटते.त्याचे कारण असे की,जर यांची निर्दोष सुटका झाली असे म्हटले तर त्या बारा वैदिक धर्म पंडितावर कारवाई झाली पाहिजे होती.त्याची इतिहासात नोंद होणे आवश्यक होते....परंतु तसे झाले नाही.त्यामुळे संभाजी ब्रिगेडच्या ७२ मावळ्यांची निर्दोष सुटका होणे हा खरा इतिहास बुजविण्याचे कार्य झाले असल्याचे माझे स्पष्ट मत आहे.याचा अर्थ स्पष्ट असा आहे की,या ७२ मावळ्यांचे कार्य वाया गेले असल्याचे माझे मत आहे.जर या मावळ्यांना जर न्यायालयाने शिक्षा सुनाविली असती...तर त्याची इतिहासात नोंद झाली असती.परंतु निर्दोष मुक्तता म्हणजे त्या संभाजी ब्रिगेडचे ७२ मावळे इतिहासातून गायब होणे असा आहे.त्यामुळे अशा प्रकारचा सर्वत्र आनंदोत्सव साजरा करणे ही आनंदाची बाब नाही.म्हणून मी म्हणतो छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येपासून...आपण “बलिदान” नावाची बाबच विसरलेलो आहे.